बीड — वर्दळीच्या ठिकाणी सोनसाखळी चोर बिनधास्त लूट करत असले तरी पोलीस यंत्रणा साट्या लोट्यातील व्यवहारामुळे हातबल असल्याचं चित्र निर्माण करताना दिसत आहे. जनता त्रस्त आहे तर पोलीस यंत्रणा व चोर मदमस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
चोरीच्या वेगवेगळ्या तीन घटनां मध्ये लाखोंचे सोने पळवण्यात आले असून याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. . गेवराई, पाटोदा आणि माजलगावमध्ये या घटना घडल्या आहेत.गेवराईत पहिली घटना घडली छत्रपती संभाजीनगरहून माहेरी बीडकडे येत असताना मोहन भास्कर रेनीवाल यांची दुचाकी अडवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे दागिने तीन अनोळखी इसमांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली.या प्रकरणी रेनीवाल यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरी घटना पाटोदा बसस्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश्री संदीपान आगाम यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली. या प्रकरणी आगाम यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर तिसरी घटना माजलगाव येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी घडली. गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिला ललिताबाई गौतम मेहता यांच्या गळ्यातील सात तोळ्यांचे बोरमाळ व मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी अंधाराचा फायदा घेऊन हिसकावून नेले. त्या रस्त्यावर खाली पडल्यामुळे चोरट्यांनी दागिने लंपास केले. सलग तीन दिवसांत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी झाल्यामुळे परिसरा चोरांची दहशत पसरली आहे.

