Sunday, February 1, 2026

पोलिसाचे कुटुंब शेतात गेले चोरट्यांनी घर फोडले

आष्टी — घराला कुलूप लावून पोलिसाचं कुटुंब शेतात गेलं. याचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडल्याची घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी घडली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळ येथील मच्छिंद्र साधू दळवी हे शेतकरी असून मुलगा गणेश दळवी हे मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे. दळवी हे शनिवारी सकाळी कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घरी कोणी नाही . या संधीचा फायदा घेत घरफोडी केली. कपाटातून अंदाजे दहा ते बारा तोळे सोन्याची चोरी केल्याचे उघडकीस आले. अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ज्ञ, फोरेन्सिक पथक,स्थानिक गुन्हे शाखा,अंभोरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
ठाणे हद्दीतील रोडलगत वस्ती असलेले व गाव परिसरातील लोकांनी शेती कामे करताना घराला कुलूप न लावता एक व्यक्ती घरी ठेवावी. सीसीटीव्ही लावावेत. जेणे करून अशा घटनांना आळा बसेल. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles