बीड — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट वगळता भाजपची स्थिती दयनीय आहे. अशावेळी स्वतःची राजकीय जमिन हरवलेल्या अशोक लोढांच्या हातात निवडणुकीची मदार सोपवल्यामुळे दयनीय स्थितीत आणखीनच भर पडली आहे. आशा अवस्थेत भाजपाला नगरपालिकेत कितपत जनाधार मिळेल याबाबत मात्र शाशंकता व्यक्त केली जात आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकांमधून भाजप विजय मिळवत असला तरी बीडमध्ये मात्र फारशी परिस्थिती चांगली असल्याचं दिसत नाही. अनेक वार्डांमधून उमेदवार मिळेल की नाही याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातच बीड नगरपालिकेत क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व राहिलेला आहे. अशावेळी इच्छुक उमेदवारांचा कल देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडेच आहे. विशेष म्हणजे शहराची जबाबदारी देखील भाजपने स्वतःचीच राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात दिली आहे. एक तर भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची वाणवा त्यातच अशोक लोढा सारख्या माणसाच्या हातात निवडणूक सोपवली अथवा तसा निर्माण केलेल्या आभासामुळे या दयनीय परिस्थितीत आणखीनच भर पडली आहे. त्यातच पुन्हा जैन धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात धुडगूस घालून जितेंद्र बोरा यांना केलेली मारहाण भाजपच्या संस्काराला न शोभणारी असल्याने बीड शहरातला शांततेचा स्वीकार करणारा वर्ग भाजपपासून या निवडणुकीत दुरावला जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. चौसाळा जिल्हा परिषदेतून प्रबळ उमेदवार लढतीला नसल्यामुळे नाविलाजास्तव म्हणून जनतेने अशोक लोढा यांच्या पदरात विजयाचं माप टाकलं होतं. विजयानंतर त्यांची पाच वर्षाची वाटचाल देखील विकासाच्या दृष्टीने निराशाजनकच ठरली. त्यामुळे त्यांच्या चौसाळा भागातच जनतेत फारसं स्थान राहिलेलं नाही.अशा राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात भाजप नेतृत्वाने मदार सोपवली असेल तर ती भाजपाच्या भवितव्याला घातक ठरणारी असेल असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

