Home Blog Page 96

बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्या; जलसमाधी आंदोलन स्थगित

0

बीड — बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या वतीने पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन काही काळाने स्थगित करण्यात आले.

आज दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत” हिरवा झेंडा” दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. मात्र, बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी, यासाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले. रेल्वे स्थानकाला लोकनेत्यांचे नाव दिल्यास सामाजिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक नेत्यांच्या नावाविषयी मतभेद आहेत परंतु महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अद्याप कोणीही विरोध केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जिल्हा वासियांची पसंती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले.

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनावेळी पाली गावचे तलाठी अनिल गायकवाड, मंडळ अधिकारी शीतल चाटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पो. कॉ. दुबाले, बाबर, जायभाय, तसेच आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, रासप बीड तालुकाध्यक्ष बाबासाहेब सापणकर, रामहरी चाळक अंजनवतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांची उपस्थिती होती.

प्रशासनाने या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही वेळाने स्थगित करण्यात आले. मात्र, जर मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मराठ्यांचं भगवं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा

0

धाराशिव — मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारत मुंबईत लढा Mumbai protest दिला.त्यानंतर आता दिल्लीश्वरालाही जागं करण्यासाठी मराठ्यांच भगव वादळ दिल्लीला Delhi  धडक देणार आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या Manoj jarange Patil मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट Hyderabad gadget लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे.
हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन Maratha convention

घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला यश आलं, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागन्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला आहे, मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जीआर सरकारने काढला आहे, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी OBC समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे. मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅझेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

0

बीड आणि शिरूर (का) तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणाची दिली यादी

बीड — मागील काही दिवसांपासून बीड व शिरूर (कासार) तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसाभरपाई देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजित पवार यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड व शिरूर (का) येथे शेतीसोबतच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदन दिले आहे.

बीड आणि शिरूर (का) तालुक्यात खालील ठिकाणी पावसामुळे नुकसान

बीड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामध्ये बोरखेड-लिंबागणेश ता.बीड रस्त्यावरील घोलपवस्ती, वाणी वस्तीवरील पूल वाहून गेला, साखरे बोरगाव ता.बीड येथील पुल वाहून गेला, खडकीघाट ते गोगलवाडी – दहिवंडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, बीड शहरातील मोमीनपुरा येथे घरची पडझड झाली घरात पावसाचे पाणी घुसले, वासनवाडी ता.बीड येथील तलाव फुटला. नागझरी मान्याचावाडा ता. बीड येथील रस्ता व पूल वाहून गेला.
कपिलधारवाडी ता.बीड येथे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत आणि पूल कोसळला आहे.
नाळवंडी (इजिमा ४६) रस्त्यावरील चिंचोलीमाळी-दहिफळ येथील पुल वाहून गेला.
मोरगाव ता.बीड अंतर्गत जाधववस्ती येथील घरात पाणी घुसले आहे. खडकीघाट ता.बीड येथे घरची पडझड झाली आहे. पिंपळगाव घाट ता. तेलपवस्ती येथील बंधारा कटिंग होऊन शेती वाहून गेली.

शिरूर (का) तालुक्यामध्ये देखील पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खालापुरी-पाडळी – आनंदगाव व पाडळी – तागडगाव-विसावावस्ती पुल वाहून गेला आहे.
भानकवाडी – रौंधवस्ती नदीवरील पूल वाहून गेला. धनगरवाडी करडपट्टीवस्ती नदीवरील जाणारा पूल वाहून गेला आहे. खालापुरी- बेलूरापांदी नदीवरील पूल वाहून गेला. सांगळवाडी-डोळेवाडी नदीवरील पूल वाहून गेला. जांब तागडगाव सातपुते नदीवरील पूल वाहून गेला. हाजीपूर येथील बंधारा व नदी कटिंग होऊन शेती वाहून गेली आहे.

चौसाळा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

0

चौसाळा — कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे यांचे हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी  महाविद्यालयातील प्राणांगणामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रांगोळी स्पर्धा, याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थिनीने भाग घेऊन सहभाग नोंदवला. यावेळी पदव्युत्तर संचालक डॉ. सुधाकर वनवे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य गणपती ढवळशंक, क्रीडा संचालक डॉ. संजय कदम प्रा. शेख शहानुर इत्यादी सह अनेक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : चौसाळा महाविद्यालयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

0

चौसाळा —  नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 15  सप्टे.2025 रोजी सोमवारी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये स्पर्धा महाविद्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी चौसाळा परिसरातील जवळपास 15 शाळेतील एकूण 321 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याची माहिती, प्राचार्य डॉ. पंडित खाकरे व इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रशांत साबळे यांनी दिली आहे.


सदरील परीक्षेमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन, 50 सामान्य ज्ञान चाचणी प्रश्न 100 मार्काचे ठेवले होते . स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम पारितोषिक 2500 रुपये, स्वातंत्र्य सेनानी कै. भगवानराव जयवंतराव भिलारे उर्फ अण्णा राहणार चौसाळा, यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ. विलास भिलारे यांची तर्फे, व द्वितीय पारितोषिक, स्वातंत्र्य सैनिक कै. गणपतराव बाजीराव माने राहणार मानेवाडी, यांच्या स्मृती प्रित्यर्थ  प्रा. सुधीर माने यांचे तर्फे 2000 रुपये, आणि तृतीय पारितोषिक कै. अर्जुनराव नामदेवराव साबळे गुरुजी आडसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थ डॉ प्रशांत साबळे यांचे कडून 1000 रुपये, याशिवाय प्रोत्साहन पर पाचशे रुपयाचे पारितोषिक, सुधाकर वनवे डबल शंख पंढरीनाथ हिरवे यांचे कडून प्रत्येकी पाचशे रुपये हे प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि सहभाग प्रमाणपत्र, ठेवण्यात आलेली असून, सदरील बक्षीस वितरण समारंभ हा दिनांक 18 सप्टे. गुरुवारी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर व डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांचे हस्ते वितरित होणार असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पदव्युत्तर संचालक, डॉ. सुधाकर वनवे कनिष्ठ चे उपप्राचार्य प्रा. गणपती ढवळशंक प्रा. वायबसे प्रा. अश्विनी तोवर डॉ. माणिक चव्हाण डॉ. पंढरीनाथ हिरवे प्रा. सुधीर माने माझी प्रभारी प्राचार्य, डॉ. विलास भिलारे डॉ. कुशाबा साळुंखे संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेख अमजद प्रा. फुटाणे प्रा. नागरे प्रा. सय्यद आफ्रीन , मॅडम डॉ. सय्यद शहानुर डॉ. अमर आलदे, डॉ. संजय कदम डॉ. देशमुख प्रा. कुरुंद प्रा. घाडगे प्राध्यापिका सौ सय्यद शाईन, श्रीमती नावेकर सौ मनीषा गिराम व डॉ. मंजुषा रसाळ प्रा. स्वाती हांगे खडके मॅडम ओ एस, पवार सर, प्रा. ओम चाळक डॉ. मुंडे महादेव, बबन घोडके शितल मुंडे, सवयी मॅडम प्रा. देवगुडे प्रा. प्रा. लहू शेळके प्रा. बाळासाहेब कोल्हे, सुधीर तेलप इत्यादी कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

बीडकरांची स्वप्नपूर्ती: अहिल्यानगर बीड रेल्वे सेवेला सुरुवात

0

बीड — मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात प्रथमच रेल्वे धावणार आहे. त्यामुळे17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. चाळीस वर्षांपूर्वी बीडकरांनी पाहिलेलं रेल्वेचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ हा 261 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी बीड वासियांना मोठा व दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या रेल्वे मार्गाचा स्वप्न तब्बल दोन पिढ्यांनी पाहिलं. अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या मार्गावर एकूण 19 स्थानके असतील, ज्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांचा थेट संपर्क देशाच्या इतर भागांशी होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 4100 कोटी रुपये खर्च झाले असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीतून हे काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निम्मा निधी पुरवला असून, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.

अहिल्यानगर ते बीडदरम्यान १६ स्थानके आहेत. नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरीमार्गे बीड येथे पोचेल.अहिल्यानगरहून सकाळी ६:५५ ला रेल्वे सुटेल व दुपारी १२:३० ला बीडला पोचेल. परतीच्या प्रवासात बीडहून ती दुपारी एकला सुटेल आणि सायंकाळी साडेसहाला अहिल्यानगरला पोचेल. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असेल.

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अर्चना कुटे जेरबंद

0

बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांना सीआयडी च्या टीमने पुण्यातून ताब्यात घेतले आहे ‌ भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या.

कुटे ग्रुप वर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर याचा परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेट वर झाला. यामध्ये ग्राहकांची हजारो कोटी रुपयांची रक्कम अडकली गेली. गडगडलेला कारभार सांभाळताना सुरेश कुटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाचा पैसा दिला जाईल मला थोडा वेळ द्या असा आवाहन करून वेळ मारून नेली. ज्ञानराधा मध्ये अडकलेला पैसा मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे पती-पत्नी अनेक दिवस भूमिगत झाल्यासारखे झाले. दरम्यानच्या काळात दोघा जोडीने कुटे ग्रुपच्या मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचं उघडकीस आलं

पोलिसांनी सुरेश कुटेला अटक केल्यानंतर अर्चना कुटे पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या होत्या मात्र पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्या राजरोसपणे निघून गेल्या. त्यानंतर त्या फरार आहेत पोलीस शोध घेत आहेत असं सांगितलं गेलं असलं तरी जनतेच्या बुडवलेल्या पैशाच्या जोरावर अटक टाळणं आतापर्यंत शक्य झालं.मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला .सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी

0

मुंबई — महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

त्यावर मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवडणूक आयोगाला आता ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या लागतील.

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. यामुळे निवडणूक आयोगासह राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ही मुदतवाढ मिळावी यासाठी आयोगाने कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा, सणसमारंभासह वेगवेगळी कारणं दिली होती. न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत त्यांना निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस याप्रकरणी मे महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आणि चार महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबर २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणे, मतदारयाद्या अद्यायावत करणे, आदी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह इतर काही कारणे पुढे करत निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना स्पष्ट केलं आहे की ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितलं आहे की ईव्हीएमची मागणी, कर्मचाऱ्यांची मागणी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवा. सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील, कामाचे टप्पे कसे असतील यासंदर्भात न्यायालयाने आयोगाला वेळापत्रक दिलं आहे. “मागील सुनावणीवेळी चार महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या निडणूक आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत आहे”, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने यावेळी केली.

कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका, ग्रामस्थांना धोका होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात – आ.संदीप क्षीरसागर

0

जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकातून केली मागणी

बीड —  तालुक्यातील कपिलधार येथे भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आ. संदीप क्षीररसागर यांनी केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील मौजे कपिलधार ग्रामपंचायत पाली अंतर्गत येत आहे. सदरील गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. तसेच त्याच्या बाजूला कपिलधार हे तीर्थक्षेत्र हे ठिकाण आहे. याठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी भुस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत पूल देखील कोसळली आहे. याबाबतीत आ. संदीप क्षीरसागर यांनी वारंवार शासनाकडे पत्र व्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. १३ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंत देखील कोसळली आहे. तसेच रहदारी साठी योग्य असलेला रस्ता देखील खचत चालला आहे. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी व कपिलधारवाडी ग्रामस्थांना कोणताही धोका होणार नाही यासाठी सर्वतोपरी तथा उचित कार्यवाही करावी. तसेच पुढील धोका टाळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करावे व आजघडीला जी हानी झालेली आहे याबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकातून केली आहे.

बीड, शिरूर (का),वासनवाडी येथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या

वासनवाडी ता.बीड येथील गाव तलाव फुटला असून परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी. तसेच बीड व शिरूर (का) तालुक्यातील नदी पात्रावरील रहदारी योग्य असणारा पुल वाहुन गेलेले आहेत. त्या बाबतीत तातडीने उपया योजना बाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; शाळा महाविद्यालयांना सुट्टी

0

बीड — जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे शिरूर पाटोदा आष्टी बीड वडवणी गेवराई अंबाजोगाई परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख क्युसेक  पेक्षा अधिकच पाणी विसर्ग करण्यात येत आहे तसेच वडवणीच्या उर्ध्व कुंडलिका माजलगाव मांजरा या धरणातून देखील गेटमधून हजारो क्यू सेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बीड सह महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाची संततधार सुरूच राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आश्रम शाळा अंगणवाडी यांना सुट्टी दिली आहे.

शाळांना सुट्टी दिली असली तरी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचारी यांनी शाळेत हजर राहावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.