Home Blog Page 67

मुलांनो लागा तयारीला !पोलीस दलात 15 हजार पदांची मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

0

मुंबई — महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी मिळणार आहे.आज मंगळवारी दि.12 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. ही भरती केवळ राज्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर अनेक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारी आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा असणार!

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण पाच प्रकारची पदे भरली जाणार आहेत. पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

पोलीस शिपाई: १०,९०८ पदे
सशस्त्र पोलीस शिपाई: २,३९३ पदे
कारागृह शिपाई: ५५४ पदे
पोलीस शिपाई (चालक): २३४ पदे
बॅण्ड्स मॅन: २५ पदे
ही पदे २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन भरली जात आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेचे स्वरूप नेमके कसे असेल?

ही भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबविण्यात येते. यासाठी उमेदवारांना खालील टप्प्यांतून जावे लागणार आहे.

अर्ज आणि छाननी :

सर्वप्रथम, उमेदवारांना अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. यानंतर, अर्जांची छाननी केली जाईल.

शारीरिक चाचणी:

पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाईल. यामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो. या टप्प्यात पात्र ठरणारे उमेदवारच पुढील टप्प्यासाठी निवडले जातात.

लेखी परीक्षा:

शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांची OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा गट क संवर्गातील पदांसाठी असते. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांवरील प्रश्न विचारले जातात.

अंतिम निवड:

लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीतील गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाते.

वयोमर्यादेत सूट

या भरतीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या उमेदवारांनी सन २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांनाही या भरतीमध्ये अर्ज करण्याची एक विशेष संधी दिली गेली आहे. त्यामुळे, असे उमेदवारही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

तयारी कशी करावी?

इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच दोन्ही टप्प्यांची तयारी सुरू करणे महत्त्वाचे आहे.
शारीरिक तयारी: दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करा, पुश-अप्स, पुल-अप्स आणि इतर शारीरिक व्यायाम करून आपली तंदुरुस्ती वाढवा.
लेखी परीक्षेची तयारी: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणावर लक्ष केंद्रित करा. वेळ व्यवस्थापनाचा सराव करण्यासाठी नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा.
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने आता लवकरच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पोलिस विभागात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्याचा फायदा तर त्यांना घ्यावाच लागणार आणि जोरदार तयारी करावी लागणार एवढं मात्र सत्य आहे.

महालक्ष्मी कला केंद्र पॉक्सो प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

0

सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; २७ आरोपींवरचा गुन्हा सरकार पक्षाला सिद्ध करता आला नाही

केज — बीड जिल्ह्यात 2023 मध्ये गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र, उमरी (ता. केज) येथील पोक्सो गुन्ह्यातील सर्व 27 आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालय, केज येथे विशेष पोक्सो प्रकरण क्र. 177/2023 सरकार विरुद्ध सत्वशीला या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती एस. बी. भाजीपाले यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी सुनावला.

7 जुलै 2023 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, शासनाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा उशिरा महालक्ष्मी कला केंद्र सुरु असल्याची माहिती मिळाली. तपासात असे उघड झाले की, कला केंद्रातील व्यवस्थापक लहू रामहारी अंधारे, नृत्य करणाऱ्या महिला, ग्राहक आणि इतर काही जण मिळून उपस्थित होते. त्यावेळी कला केंद्रात चार अल्पवयीन मुलींना नृत्यासाठी बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप होता. तसेच, चालक सत्वशीला बाबासाहेब आंधारे व रत्नाकर शिंदे यांनी आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींचा वेश्याव्यवसायासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला. पीडिता दलित समाजातील असल्याने, माहीत असूनही तिच्यावर दबाव आणून आणि पैशाचे आमिष दाखवून शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात भा.दं.वि., पोक्सो कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 आणि अ.जा.जा.अ. प्र.का. यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी करून सर्व 27 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाकडून एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सरकार पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. आरोपींच्या वकिलांच्या बचावामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील लहू अंधारे, शीतल अंधारे, संगीता काळे आणि संतोष बडगे हे चार आरोपी निकालापर्यंत कारागृहात होते, तर उर्वरित आरोपी जामिनावर होते. आरोपींच्या बाजूने ॲड. अजित लोमटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संस्कार शिनगारे, ॲड. चंद्रकांत जाधव, ॲड. ओमप्रकाश धोत्रे आणि ॲड. अभिजित सोळंके यांनी सहकार्य केले. या प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

गेवराई : माजी पंचायत समिती सभापतीच्या पतीचा ग्रामसेविकेवर बलात्कार

0

छत्रपती संभाजी नगर — गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतीचा पती दीपक सुरवसे याने महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याची धमकी देत तिच्यावर रेल्वेस्टेशन भागातील हॉटेलसह, नाशिक, नगर येथे नेऊन वारंवार अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे.
अत्याचार पीडित ग्रामसेवक महिलेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. शहरात राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यासह मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गारखेडा भागातील घरासमोर गोंधळ घातला. हा प्रकार १४ सप्टेंबर २०२२ ते २ जुलै २०२५ या काळात घडला. १ ऑगस्ट रोजी बीड येथे गुन्हा दाखल होऊन वेदांत नगर ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. ३५ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती सहा वर्षांपूर्वी गेवराई पंचायत समितीमध्ये नोकरीला लागली. तेव्हा पंचायत समितीच्या सभापती म्हणून दीपक सुरवसेची पत्नी कार्यरत होती. मात्र, दीपक हाच पंचायत समितीच्या कार्यालयात बसून कामकाज पहायचा. कर्मचाऱ्यांना तो सूचना देत असल्याने तेव्हा पीडितेची त्याच्याशी ओळख झाली.

सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसेने पीडितेला फोन करून रेल्वेस्टेशन भागातील हॉटेल विट्स येथे बोलावले. कामाचे बोलणार असेल या समजुतीतून पीडिता गेली. तेव्हा सुरवसेने तिच्यावर जबरदस्ती केली. विरोध करताच नोकरी गमवावी लागले अशी धमकी दिली. पीडितेने आरडाओरड केली मात्र, तिचा आवाज बाहेर गेला नाही. सुरवसेने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सुरवसेने फोटोसुद्धा काढले असून कोणाला काही सांगितले तर नोकरी घालविल आणि तुझ्या घरी सांगेल अशी असे धमकावले. अधिक तपास महिला उपनिरीक्षक संगीता गिरी करत आहेत.
नाशिक, नगरच्या रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार

सुरवसेने पीडितेला ब्लॅकमेल करून नाशिकच्या केव्हज कंट्री, इगतपुरीचे मानस रिसॉर्ट, दौलताबाद भागातील हिरण्य रिसॉर्ट, अहिल्यानगर येथील ओरोस हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. तो तिला सातत्याने बाहेरगावी नेऊन अत्याचार करू लागला. लग्राचे आमिष दाखवू लागला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन देत होता.

पीडितेच्या पतीला मारण्याचा कट रचला

सुरवसेने पीडितेच्या पतीला मारण्याचा कट रचला. असाच धाक दाखवून त्याने मे २०२५ मध्ये पीडितेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे गारखेडा भागात राहण्यास आलेल्या पीडितेच्या घरी येऊन सतत अत्याचार करू लागला. २ जुलै रोजी कारमधून (एमएच-२३-एयु ५००१) घरासमोर येऊन गोंधळ घातला. तुझे व्हिडिओ तुझ्या मुलांना दाखवतो अशी धमकी दिली. हा फक्त ट्रेलर आहे, जास्त शहाणपणा केलास तर इज्जत उतरविल अशी धमकी दिली.

देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा

0

नवी दिल्ली — ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला.यामध्ये काँग्रेस, सपा, आप, द्रमुक यासह अनेक पक्षांनी यात भाग घेतला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले.

सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते. ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले असून संसदेच्या मकरद्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं.यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.
मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग होता.निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत. संसदेपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला असून शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसले
तत्पूर्वी, आज निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्ट मंडळाला बैठकीसाठी बोलावले. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12:00 वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे, कृपया जास्तीत जास्त 30व्यक्तींची नावे द्या असे सांगण्यात आलं.
मात्र गेलो तर आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता, असं विरोधकांचं म्हणण आहे.

मतदार यादीवरून वाद सुरूच

मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील लाँच केली. तसेच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केलं.

अनेक खासदार बॅरिकेड्सवर चढले आणि ते ओलांडून उड्या मारल्या, त्यात अखिलेश यादव यांचाही समावेश होता. तर टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा याही बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादवर हे ठिय्या देऊन बसले. तर निवडणूक आयोगाकडे फक्त 30 खासदार नाही तर आम्ही सर्व जाणार असं जयराम रमेश यांनी सांगितलं. पोलिसांनी जाऊ दिल तर आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊ, पण ते आम्हाला जाऊच देत नाहीयेत असं अखिलेश यादव म्हणाले.

गोसावींच्या वरदहस्ताने नेकनूर बनतेय गोमांस तस्करीचा अड्डा

0

बीड — जनावरांची मोठी बाजारपेठ असलेल्या नेकनूर मध्ये गोवंशाची हत्या करून गोमांसाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. गोवंश हत्या विधेयकाची गळचेपी ठाणे प्रमुखाच्या वरदहस्ताने होत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील गावामधून जुगारासह बनावट व अवैध दारूचा पूर वाहू लागला आहे. शेतीमालावर दरोडे टाकणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. माध्यमामधून तसेच जनतेकडून पोलीस अधीक्षकांपर्यंत याची तक्रार केली जात असली तरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचाच परिणाम म्हणून ठाणे प्रमुख गोसावींना वरिष्ठांचा धाक वाटेना असा झाला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत जरी प्रामाणिक अधिकारी असले तरी त्यांचा वचक कर्मचाऱ्यावर राहिलेला नसल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अवैध धंद्यामधून मिळत असलेल्या कमाईचा लाभ वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याने गोसावींना अभयदान मिळत असल्याची चर्चा जनतेत होऊ लागली आहे. पत्यांचे क्लब ,मटका, हातभट्टी, दारू, केमिकल युक्त ताडी यासारखे अवैध धंद्यांमधून मिळणारी कमाई कमी आहे म्हणून की काय पण गोवंश हत्येकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून नेकनूर गोमांस विक्रीच केंद्र बनलं आहे. गोवंश हत्या बंदी विधेयकाचे तीन तेरा वाजवले जात आहेत. या ठिकाणावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस तस्करी ऑर्डर प्रमाणे केली जात आहे. बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात 27 जुलै 2025 रोजी गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना बार्शी नाका भागात पकडल्याची घटनेची नोंद करण्यात आली होती. अरबाज जलाल खान पठाण वय वर्ष 26, दर्गा कॉलनी नेकनुर याला पकडले देखील.यावेळी पोलिसांनी गोमांस सुद्धा जप्त केले होते. असं असतानाही पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रमुख मूदीराज यांना प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता वाटली नाही. थोडाफार पैसा घेऊन तात्काळ जामीनही देण्यात आल्याने त्यांच्या देखील प्रामाणिकतेवर जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यभरात कुरेशी समाजाने बहिष्कार टाकल्याने जनावरांचा बाजार ठप्प झालेला असला तरी गोवंशाच्या हत्या करणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याच पाहायला मिळत आहे. अशा घटना उघडकीस येऊनही नेकनूर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून गोवंश हत्या करणारा विरोधात कारवाई करावी. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या ठाणे प्रमुखावर देखील कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यातील बोगस शिक्षकांवर कारवाई, कागदपत्रांची पडताळणी होणार; आतापर्यंतचे वेतन परत घेणार

0

नागपूर — राज्य सरकारने शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी (document verification) केली जाणार आहे. बोगस शिक्षक असूनही ते वेतन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षकांची पडताळणी केली जाणार आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शासनाकडून दर महिन्याला वेतन घेत असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत.
अनेक शाळांमध्ये बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. याच कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहिम राबवली आहे. 18 नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची माहिती मागवली आहे. याची विभागीय आयुक्तांद्वारे फेरपडताळणी होणार आहे.राज्यातील सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळा 1 लाख 23 हजार आहे. त्यामध्ये पावणेपाच लाख शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी 55 ते 60 हजार कोटी रुपये दिले जातात. आतापर्यंत कधीच ही तपासणी झाली नव्हती. परंतु आता बोगस शिक्षकांना शोधण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली आहे.
नागपूर Nagpur, बीड सह राज्यात बोगस शालार्थ आयडी सापडले आहे त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही असे बोगस शिक्षक (bogus teacher)असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे (School Education Department) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमले आहे. त्यांची समिती सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही तपासणी होईल.बोगस शिक्षकांवर कारवाई होणार

शिक्षणाधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन बनावट शालार्थ आयडी बनवून हजारो शिक्षण सरकारकडून वेतन घेत आहेत. त्यांचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यांची कागदपत्रे ही शिक्षणाधिकारी कार्यालयातील कागदपत्रांशी जुळतात का, हे पाहून त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर हे बनावट कर्मचारी आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या बोगस शिक्षकांनी आजपर्यंत घेतलेल्या वेतनाची वसूलीदेखील केली जाईल, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी तसेच शासनावर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाला बसल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळालं. शासनावर दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या व भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

तरुणी तृतीयपंथीयाच्या जाळ्यात अडकली; तृतीयपंथीयासह तिघांकडून बलात्कार

0

बीड — गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्हा चर्चेत राहत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एक खळबळजनक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काम देण्याची भुलथाप देत एका तृतीय पंथीयानं (transgender)भयानक कृत्य केलं. एका २० वर्षीय तरूणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं. नंतर आळीपाळीने तिघांनी तिच्यावर बलात्कार (rape case)केला. या प्रकरणी पोलिसांनी तृतीय पंथीयासह चौघांवर अंबाजोगाई (ambajogai)ग्रामीण पोलीस (rural police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शनिवारी पहाटे घडली.या घटनेतील पीडिता (वय २०) मुळची हैद्राबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ती मुंबईत (Mumbai)घरगुती साफसफाईच्या कामावर होती. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती मुंबईहून हैद्राबादला (Hyderabad)जाण्यासाठी रेल्वेने(railway) निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत (railway station)उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली.
पुजाने तिच्याकडून तिचीच माहिती काढून घेत तिची गरज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तृतीय पंथीयानं तिला काम देण्याची भुलथाप दिली. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले.
त्यानंतर ते तिघे पिडीतेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये घेऊन गेले. नंतर जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. नंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती करत बलात्कार (rape)केला.

‎दरम्यान, गावात सुरु असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाने शनिवारी पहाटे डायल 112 वर कॉल करून पोलिसांना दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहा. फौजदार टोले यांनी अस्वलआंबा गाठले आणि पिडीतेची सुटका केली. यावेळी पोलिसांना पाहताच पूजाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांना 14 ऑगस्टची डेडलाईन

0

बीड — आष्टी शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील बोगस मतदाराच्या अहवालावर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी 14 ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावे अन्यथा शासनाचे काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Ashti Assembly Constituency ) 1 नोव्हेंबर 2023 च्या प्रारूप यादीमध्ये जवळपास 550 मतदारांची नावे बनावट कागदपत्राच्या आधारे नगरपंचायत हद्दीत, भागात समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे, नदीम शेख व इतरांनी केल्या होत्या. सदरील प्रकरणांमध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील तक्रार केली होती. या प्रकरणांमध्ये उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer)पाटोदा (patoda)यांनी चौकशी करून जिल्हाधिकारी बीड (collector Beed) यांच्याकडे अहवाल सादर केला.तसेच संबंधित मतदारांच्या नमूद वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करून पंचनामे केले होते. त्यामध्ये सदरील मतदार नमूद पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे आढळून आले होते. (Aurangabad High Court) तसेच सदरील 550 नावे बनावट व खोट्या कागदपत्राच्या आधारे समाविष्ट करण्यात आल्याचे नमूद करून सदरील प्रकरणासंबंधीत मतदान केंद्र स्तर अधिकारी (बीएलओ) यांना दोषी धरून त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पाठवण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली होती.
विशेष म्हणजे बोगस मतदारांनी नगरपंचायत आष्टीच्या निवडणुकीमध्ये मतदानही केले होते. अर्जदार राम सूर्यभान खाडे, शेख नदी रसिक यांनी निवडणूक आयुक्त, नगर विकास सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती. आष्टी मधील कर्मचारी शिवकुमार तांबे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून रहिवासी प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले होते. तरीही, फौजदारी कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राम खाडे व अजीम शेख यांनी ॲड. नरसिंह जाधव यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल केली होती.सदरील याचिकेत या पुर्वीच्या सुनावणीत जिल्हाधिकारी कार्यवाही करणार आहेत किंवा नाहीत? याबाबतचा खुलासा शपथपत्रात करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 12 जून रोजीच्या सुनावणीत कुठलेही शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे आता 14 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नाही तर शासनाचे काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील निर्णय घेण्यात येईल असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 26 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. नरसिंह जाधव हे काम पाहत आहेत.

गोरक्षकांना आवर घाला; अजित पवारांच्या पोलिसांना स्पष्ट सूचना

0

मुंबई — गोवंश हत्या बंदीतून बाहेर असलेले आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्यास सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यापासून खासगी व्यक्तींना रोखावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बुधवारी कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत. या बैठकीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठीकत उपस्थित असलेल्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांना एक पत्रक काढण्याची सूचना दिली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खासगी व्यक्तींना नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश या पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्यात यावे, असे अजित पवार म्हणाले.

गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर कथित गोरक्षक कायद्याच्या आडून म्हैसवर्गीय म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्यांच्या वाहतुकीचे ट्रक अडवितात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात, अशी तक्रार कुरेशी समुदायाने अजित पवारांसमोर मांडली. तसेच बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्यावेत आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा मागण्यांचे निवेदन कुरेशी समुदायाकडून करण्यात आले. “कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मांस व्यापाराशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा भाग आहे. या समुदायाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही”, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

बेकायदा गोरक्षकांकडून होत असलेल्या छळाबाबत कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. “कुरेशी समुदायातील व्यापारी आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गोरक्षकांनी केलेल्या हिंसक कृत्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे समुदायाला जूनपासून संप पुकारावा लागला आहे. भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर कायद्याने परवानगी असलेल्या म्हैसवर्गीय प्राण्यांच्याही वाहतुकीवर परिणाम होत आहे”, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदार सना शेखही उपस्थित होत्या. त्यांनी शिष्टमंडळाची मागणी अजित पवारांसमोर मांडली. तसेच असामाजिक घटकांमुळे जनावरांची कायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी दिली. कायद्यानुसार फक्त पोलिसच वाहनांची तपासणी करू शकतात, असे असूनही बेकायदेशीर गोरक्षकांचा धोका वाढत असून त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे खोडके म्हणाले.

नशेडी नातवाकडून आजीवर जीव घेणा हल्ला; आई-वडिलांनाही केले जखमी (crime)

0

परळी — व्हाइटनरच्या नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने आज्जीवर पैशासाठी जीवघेणा हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळ जनक घटना (Parli)तलाब कट्टा फूले नगर परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.पोलिसांनी (police)आरोपीला अटक केली आहे.
शहरातील तलाब कट्टा भागात राहणाऱ्या कुरेशी कुटुंबातील 80 वर्षीय जुबेदा इब्राहिम कुरेशी घरात बसलेल्या असताना अरबाज रमजान कुरेशी हा वीस वर्षीय नातू नशेत घरी आला. अरबाजने आजीकडे पैशाची मागणी केली. आजीने पैसे देण्यास इन्कार केला. शिवीगाळ करूनही आजी पैसे देत नाही म्हणून संतप्त झालेल्या अरबाजने हातात असलेल्या सत्तूरने आजीच्या तोंडावर वार केला. यावेळी झालेल्या गोंधळाचा आवाज ऐकून अरबाज ची आई समीना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी हे दोघेही धावत आले. अरबाज ने केलेल्या हल्ल्याने आजी अत्यावस्थ स्थितीत गेली. आई आणि वडील धावून आल्याचे पाहताच अरबाज याने त्या दोघांवरही हल्ला चढवला. यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर अरबाज पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.मात्र घटना घडल्यानंतर काही क्षणातच संभाजीनगर पोलिसांनी (Sambhaji Nagar police) घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले. पोलीस निरीक्षक संजय ढोणे यांनी ताबडतोब कारवाई करत आरोपीला पकडून जखमी वृद्ध आजीला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात (SRT hospital ambajogai)पाठवून दिले. तर आरोपीच्या आई-वडिलाला प्राथमिक उपचार करून त्यांना देखील अंबाजोगाई येथील रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.