Home Blog Page 50

नावाजलेल्या जिओचं भंगार नेटवर्क; टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन

0

लिंबागणेश — घाटमाथ्यावर जिओच्या नेटवर्कला समस्या येत आहेत. सगळ्यात भंगार नेटवर्क म्हणून जिओची गणना होऊ लागली आहे. याचा फटका लिंबागणेशसह चौसाळा परिसराला देखील होत आहे. जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट, पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले. जिओच्या भंगार नेटवर्कला वैतागून शेवटी आज लिंबागणेशकरांनी टॉवर वर चढून लक्षवेधी आंदोलन केले.

जिओ कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा सुरळीत करावी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी लिंबागणेश येथील जिओ टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.महसूल व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे व तलाठी पोतदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नेकनूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती–भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, सुरेश निर्मळ, मधुकर थोरात, सर्पमित्र अशोक जाधव, औदुंबर नाईकवाडे, विक्रांत वाणी, सोनाजी शिंदे, सोनाजी कुदळे, संजय पावले,केशव गिरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिओ कंपनीच्या ढिसाळ सेवे विरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्धार व्यक्त केला असून अनेक युवकांनी आपली जिओ सिमकार्ड इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तातडीने सेवा सुधारली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वळण रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0

माजलगाव — शेतातील वळण रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तो दबल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिवरा बुद्रुक गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली
गणेश भारत गाडे वय 28 वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे.
गणेश गाडे हा गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात होता.यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत

नेकनूर पोलीसांची कामगिरी;गांजा तस्करी करणारे दोन जण पकडले तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0

नेकनूर — नेकनूर पोलिसांना गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी कांहीं जण करत असल्याची गूप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना मिळाली. त्यांनी माहिती मिळताच तात्काळ कारवाई करत एका शेतात छापा मारुन फर्दाफ़ाश केला.या कारवाईत तीन लाखांचा गांजा जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील हिंगणी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात सिमेंटच्या गोणीत गांज्या भरून ठेवण्यात आला होता.याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी व त्यांच्या टीमने छापा मारला.यावेळी शेतात दोन सिमेंटच्या गोणीत 11 किलो 150 ग्रॅम गांज्या पोलिसांना सापडला.याची किंमत 2 लाख 78 हजार 750 रुपये इतकी आहे ‌या गांज्याची तस्करी होणार असतानाच पोलिसांनी गुमानसिंग शिवराम पावरा वय-35 वर्ष,रा.बोरमल्ली पाडा,ता.शिरपूर,जि. धुळे व मनोज सीताराम मेहता वय19 वर्ष,रा.बाखरली,ता.वरला,जि.बडवानी राज्य.मध्यप्रदेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.नेकनूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करीत आहेत.

कॉपी प्रकरणी चौसाळा महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

0

बीड — चौसाळा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची बातमी समोर आली आहे.काही पालक खिडक्यांमधून चढून कॉपी पुरवताना दिसले. हा ड्रोन व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र संचालकासह 17 शिक्षकाविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौसाळा येथील बारावी परीक्षेदरम्यान कॉपी पुरवतानाचा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला होता.शिक्षण विभागाने हा व्हिडिओ जारी केला असून त्यात परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची बाहेरून मदत किंवा साहित्य पुरवणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचं स्पष्ट केले आहे. असं असूनही, काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलांना कॉपी पोहोचवताना दिसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचं गंभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.ड्रोन व्हिडिओच्या आधारे, परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी रात्री तपासले. जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात शिक्षक, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात बीडचे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी समंदर हमीद खान पठाण  यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केंद्र संचालक संजय घाडगे,भागवत बब्रुवान कुरुंद दोन्ही कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,चौसाळा ता.जि. बीड, गोरोबा धोंडीराम बचुटे, श्रीमती राजेश्री गोविंद माने, वसीम शेख,आर.जी करडकर
एस.आर दांगट सर्व रा.प्रमीलादेवी कनिष्ठ महाविद्यालय नेकनुर ,विनायक अशोकराव वजे, ताराचंद रेवा राठोड , ए.बी अघाव, पी. के. रसाळ, जी. बी चक्रे सर्व रा. डाॅ. पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा, सी.एस मुळीक बी. बी. सुपेकर, यु डी उगले, एम.एस गवई
बालासाहेब दामो पवार सर्व रा.भालचंद्र माध्य उच्य मा. विद्यालय लिंबागणेश यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

बीड — येथे 174 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान बुधवारी (दि.11) दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर वाव्हळ रा. मांडेखेल.ता. परळी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता. भरती दरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच अचानक मैदानावर भोवळ येऊन कोसळला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशन मुळे हार्ट अटॅक आला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे ‌

दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

उद्या भारत बंदची हाक!! काय बंद, काय सुरु राहणार?

0

नवी दिल्ली — देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे.

उद्याच्या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होऊ शकतात असा कामगार संघटना नेत्यांचा दावा आहे. परिणामी, उद्या अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये आणि औद्योगिक कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्या कोणकोणत्या सेवा या बंद राहतील आणि कोणत्या सुविधांना मुभा देण्यात आली आहे ते आपण जाणून घेऊया.

उद्याची भारत बंदची हाक हि नवीन लेबर कोड आणि भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात आहे. या नवीन बदलांमुळे देशाच्या कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या नवीन धोरणांचा या संघटनांनी विरोध केला आहे. भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा समावेश आहे. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे कायदे कंपन्यांना अधिक फायदे देत असून कामगार संरक्षण कमी करतील. शेतकरी संघटनांनीही या चळवळीला पाठिंबा दर्शविला आहे.

उद्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही भागात बंद राहू शकतात किंवा मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात.
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये उपस्थिती कमी असू शकते.
बस, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा कमी वेगाने चालू शकतात किंवा काही भागात बंद राहतील.
कारखाने आणि औद्योगिक युनिट्स एका दिवसासाठी कामकाज थांबवू शकतात.
ज्या भागात संप सर्वात प्रभावी आहे तेथे शाळा आणि महाविद्यालये बंद राहू शकतात.
अनेक शहरांमध्ये बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने देखील बंद राहू शकतात.

उद्या, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंद असला तरी काही जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील. रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय मेडिकल, एटीएम, अग्निशमन दल आणि मदत सेवा, दूध पुरवठा, वर्तमानपत्र वितरण, विमानसेवा सुरूच राहणार आहेत .

अपहरण मुलीच्या पीडित कुटुंबाला पोलिसांकडून मारहाण अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

0

पीडित कुटुंबाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल

बीड — धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीच अपहरण केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मारहाण करून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार नेकनूर पोलिसांनी केला. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांसह इतर अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलगी एक डिसेंबर 2025 पासून गायब आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी तक्रारही दाखल करून दोन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मुलीच्या वडिलांनी संशयितांची नाव देखील सांगितली आहेत. मात्र पोलिसांच्या हाती अजून काहीच लागले नाही. पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. ठाण्याचे उंबरे झिजवले मात्र पोलिसांनी समाधानकारक उत्तर कधीच दिले नाही. दरम्यान मंगळवारी पीडित कुटुंब नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात आले असता नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केली. पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकाराला ही दमदाटी करण्यात आली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये संशयित आरोपीचे नातेवाईक रुक्मिण पांडुरंग चोबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र अपहरण झालेल्या मुलीचे पीडीत कुटुंब न बोलवता पोलीस ठाण्यात त्याच वेळेत हजर झाले. पीडित कुटुंबाला तपासाची माहिती देण्यात आली. दरम्यान फिर्यादीचे व आरोपीचे कुटुंब बाहेर पडत असताना एकमेकांना शिवीगाळ करू लागले. एकमेकांना मारहाण देखील करू लागले. हा प्रकार पोलिसांनी सोडवला. या प्रकारामुळे सामाजिक शांतता भंग झाली. पोलीस ठाणे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी पोलिसांनी रुक्‍मीन पांडुरंग चोबे, कृष्णा गोविंद चोबे, पांडुरंग बाबासाहेब चौबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे, बब्रुवान नवनाथ गायकवाड, गवळण बाई बब्रुवान गायकवाड, बिभीषण हरिदास भोसले व इतर अन्य यांच्या विरोधात पोलीस हवालदार सतीश राऊत यांच्या फिर्यादीवरून कलम 194 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी केजचे उपविभागीय अधिकारी करणार असून सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. या प्रकरणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

कोयत्याचा धाक दाखवला; टोळीतील ट्रॅक्टर चालकाने बालिकेवर दोन वेळा अत्याचार केला

0

केज — ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुराच्या तेरा वर्षीय मुलीवर टोळीतील ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोन वेळेला बलात्कार केल्याची घटना घडली आहे.युसूफवडगाव पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, सूरज अशोक खरात रा. जामरून, ता. जिंतूर, जि. परभणी हा त्याच टोळीत ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास सुर्डी शिवारातील एका कोपीत तेरा वर्षीय मुलीला एकटे गाठून सुरज खरात ने कोयत्याचा धाक दाखवत अत्याचार केला. एवढ्यावरच तो न थांबता ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हादगाव शिवारात त्याने पीडितेवर बळजबरी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुकलीने अखेर आपल्या आईला हा प्रकार सांगितला.पीडित बालिकेच्या आईने हिंमत दाखवत मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम सूरज खरात आपला ट्रॅक्टर हादगाव शिवारात सोडून फरार झाला आहे. सध्या ‘पिंक पथका’चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.

अजित पवारांच्या मृत्यूभोवती संशयाचं वर्तुळ;रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

0

मुंबई — राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहे. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा आतापर्यंत विरोधक आरोप करत होते. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

यावेळी विमान अपघाताच्या वेळीचा एक नवीन व्हिडीओ सुद्धा समोर आणला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एक सादरीकरण करून विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजितदादांच्या विमानाला कशा प्रकारे अपघात झाला, याचा व्हिडीओ सुद्धा दाखवला आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुकं साचले आहे. विमान हे धावपट्टीच्या बाजूला कोसळलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला दिसून येत आहे. विमानाचा स्फोट झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. धावपट्टीच्या बाजूला एक लाईन दिसत आहे, त्यानंतर स्फोट झाला, ती लाईन काय आहे, आग आहे का, हे बघावे लागणार आहे. धावपट्टीवर ५ किमी पेक्षा कमी दृश्यमानता होती पण तरी सुद्धा विमानाचं लँडिंग का करण्यात आलं होतं, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.

बारामतीच्या विमानतळावर खासगी विमानासाठी प्रशिक्षण दिलं जातं, यावेळी लावण्यात आलेल्या एका कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

‘हा अपघात नाही घातपात’

“हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे. आमचा सरकार किंवा कुणावर आरोप नाही. पण सीआयडीला ही अथॉरीटी नाही. गुजरातला ब्लॅक बॉक्सचे बोलणे सांगितले नाही, पण आमचे म्हणजे आहे की कुटुंबातील कुणाला तरी ते संभाषण एकले जावे आम्हाला त्यांना सांगायचे आहे. राजकीय दृष्टीकोणातून नाही पण व्यवहारीक दृष्टीने काही गोष्टी दाबल्या जात आहे असे आम्हाला वाटते. संथ गतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तपासात इट्रेन्स नाही, असे म्हणावे लागले. वीएसआर कंपनीच्या सर्व्हिस बंद कराव्यात” अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

कांवत साहेब..! आज तर गोसावींनी डंकाच वाजवला; मुलीचा शोध लागेना म्हणून तक्रारदाराचा नातेवाईकच झोडपला

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या कारकिर्दीत अजब काय घडेल सांगणं अवघड झालं आहे. पोलीस ठाण्याला तक्रारी तर घेतल्या जात नाहीत पण घेतलीच तक्रार तर तपासात यश येत नाही. मग काय तक्रारदाराचे नातेवाईक झोडपायचे गुन्हे दाखल करायची धमकी द्यायची हा नवा फंडा एसपींच्या लाडक्या गोसावींनी सुरू केला आहे. धावज्याचीवाडी येथील अल्पवयीन मुलगी दोन महिन्यापासून गायब आहे. पालक पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत. नेहमीप्रमाणे आजही ते नेकनूर मध्ये आले. पोलिसांची त्यांची बाचाबाची झाली मग काय आपल्या कर्तुत्वाचा डंका वाजवण्यासाठी तक्रारदाराच्या नातेवाईकांना झोडपून काढलं. पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला ही धमकावलं. यापेक्षा वेगळी कायद्याच्या राज्याची संकल्पना काय असू शकते? बीडची जनता मात्र अशा घटनांनी धन्य धन्य होऊ लागली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये जाळपोळ झाली. त्यावेळी पोलीस अधीक्षक असलेले नंदकुमार ठाकूर यांच्यावर हे प्रकरण शेकले गेले त्यांची बदली झाली. जाळपोळ झाली असली तरी जनता सुरक्षित होती हे वास्तव मान्य करायची वेळ आली आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर काही काळासाठी अविनाश बारगळ विराजमान झाले होते. मात्र त्यानंतर जिल्ह्यात घडलेल्या अप्रिय घटनेनंतर  मोठ्या वल्गनेसह गाजावाजा करत नवनीत कांवत अधीक्षक पदावर विराजमान झाले. त्यांच मोठेपण जितकं मिरवलं गेलं तितकाच त्यांच्या मोठेपणाचा फुगा फाडकनं फुटला आहे. कायदा सुव्यवस्थेची जिल्ह्यात पुरती वाट लागली आहे. पोलीस अधीक्षक फक्त एम पी डी ए, मकोका प्रकरण करण्यात धन्यता मानत आहेत. पण जिल्ह्यात सगळी घाणच घाण झाली आहे. सगळ्या अवैध धंद्यांना पोलिसांचं संरक्षण मिळत आहे. माध्यम याचा उहापोह करीत असली तरी ज्या बीडच्या पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना डोक्यावर घेतलं तेच पोलीस अधीक्षक पत्रकारांची पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत लायकी काढण्यापर्यंत मजल मारत असल्याचं सांगितलं जात आहे. ही कदाचित वदंता ही असू शकते. पण कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलगी एक डिसेंबर 2025 पासून गायब झाली. मुलीच्या वडिलांनी 4 डिसेंबर रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. संशयितांची नाव देखील सांगितली. घटनेला दोन महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. पालक मात्र नेकनूर पोलीस ठाण्याच्या चकरा मारून परेशान आहेत. मुलीचा शोध लागत नाही म्हणून मुलीच्या आईने काही दिवस अन्न पाणी ही वर्ज्य केले होते. तब्येत खालावत होती. नातेवाईकांच्या आग्रहास्तव मुलीच्या आईने खाण पान सुरू केले. 12 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध लागावा म्हणून नेकनूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केले होते. प्रत्येक वेळी पोलिसांचं एकच उत्तर तपास सुरू आहे. नातेवाईकांच पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवण्याचं चक्र गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. आज देखील असेच नातेवाईक पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांना विचारणा करायला गेले. संतापलेल्या पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना झोडपून काढले. त्यातल्या एका नातेवाईकाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची दमदाटी केली गेली कदाचित गुन्हा दाखल देखील झाला असेल. शेवटी ते पोलीस आहेत त्यांच्यापाशी ओल ही जळतं वाळलं ही जळतं असं सांगितलं जातं.आता खरा एसपींना अपेक्षित न्याय झाला. असं म्हणायची वेळ आली.एक बिचारा पत्रकारही गोंधळाचा आवाज ऐकून न रहावल्यामुळे पोलीस ठाण्यात काय घडत आहे याचा वार्तांकन करायला गेला. त्यालाही पोलिसांनी दमदाटी करून दादागिरी ची भाषा वापरली. आता पोलीस अधीक्षकांच्या कायदा सुव्यवस्थेच्या जिल्ह्यात पत्रकारांना वार्तांकन करणे देखील अवघड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे प्रकार मात्र नंदकुमार ठाकूर यांच्या काळात कधीच पाहायला मिळाले नाहीत. हे वास्तव देखील नाकारता येत नाही. पोलीस कर्मचारी देखील इतके लाडवून कधीच ठेवले नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच असे प्रकार घडू लागल्याचं पहायला मिळू लागला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस अधीक्षकांचा लाडका आहे. मग जनतेला न्याय मिळणार कसा? पीडित अल्पवयीन मुलीचं तिच्या नातेवाईकाचं काहीही झालं तरी देणं घेणं काय? आपला खास मर्जीतला माणूस मजेत राहिला म्हणजे झालं एवढ महत्त्वाचं. मग कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले पोलीस दलाची इभ्रत टांगली गेली तर काय हरकत आहे कदाचित असा विचार केला असावा. पोलीस अधीक्षकांनी कमीत कमी तक्रार दाखल करू नये दाखल केलीच तर तपास कुठपर्यंत आला आहे याची विचारणा करू नये, पत्रकारांनी वार्तांकन करू नये असे अलिखित फतवे तरी काढावेत म्हणजे वर्तमानपत्राचे रकाने काळे करण्याची वेळ तरी येणार नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. पीडित कुटुंबांला न्याय मिळणारच नाही असं तरी सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे.