Home Blog Page 102

बीडमध्ये भीषण अपघात ! भरधाव कंटेनरच्या धडकेत 6 तरुणांचा मृत्यू

0

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावरील Dhule Solapur National Highway बीड तालुक्यातील नामलगाव namalgaon फाटा येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. भरधाव कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा व्यक्तींना चिरडल्याने हा अपघात road accident घडला.

यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा बीड जिल्हा रुग्णालयात  उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बीड तालुक्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये दिनेश दिलीप पवार (माऊली नगर, बीड), पवन शिवाजी जगताप (अंबिका चौक, बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (शिदोड, ता. बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा, ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रिलायन्स पंप परिसर, बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय २२, शेकटा, ता. शेगाव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पायी जात होते.

बीड ते पेंडगाव असा पायी प्रवास करताना नामलगाव फाटा येथील उड्डाणपूल ओलांडून एसआर जीनिंगजवळ S.r. giningचालत असताना मागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात सहाही जण गंभीर जखमी झाले, त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. बीड ग्रामीण पोलिसांनी police कंटेनरच्या दोन चालकांना ताब्यात घेतले असून, मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

या महामार्गावर सर्व्हिस रोडच्या service road अभावामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे. या दुर्घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, रस्ता सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ.संदीप क्षीरसागर

0

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

बीड  — बीड विधानसभा क्षेत्रात  Beed Assembly Constituency मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे heavy rain  मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई crop  compensation for damages  देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील उभा असलेला कापूस, सोयाबीन, बाजरी आदीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पशुहानीसह शेतकरी व ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांचे, पिकांचे व पशुहानीचे तातडीने पंचमाने करण्यासाठी बाबतचे आदेश विभागाला द्यावेत, जेणेकरून शेतकरी बांधवाला सरसकट आर्थिक मदत मिळेल. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर  Sandeep Kshirsagar मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

विवेक” हरवलेल्या प्रशासनाने आत्मदहनाला भाग पाडलं; प्रयत्न करताच तुटेपर्यंत पळालं

0

बीड — जनतेच्या दुःखावर “जॉन्सन” मलम लागेल वेदना कमी होतील अशी अपेक्षा होती मात्र “विवेक “शून्य प्रशासनाने न्याय मागणाऱ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अंत पाहिला. इशारा देऊनही शेवटचा मार्ग म्हणून आत्मदहनाचा मार्ग अवलंबला त्यावेळी मात्र व्यवस्था तुटेपर्यंत पळाल्याचं विदारक करूण चित्र बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाल.
केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटूंब 15 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. रामहरी वायबसे यांचे सख्खे भाऊ डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडून व गुंडांमार्फत अनेकदा मारहाण झाल्याचा आरोप रामहरी वायबसे यांनी केलेला आहे. त्यांच्याविरूध्द कारवाई करावी यासाठी ते सपत्नीक उपोषणाला
बसलेले आहेत. मात्र प्रशासन उपोषणाची कसलीच दखल घेत नसल्याने रामहरी वायबसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कुटूंबासह उपोषणाला बसूनही प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या रामहरी वायबसे हे आज सकाळी हातात डिझेलचे कॅन्ड घेऊन उपोषण स्थळापासून थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत धावत सुटले. मला न्याय द्या, जगुन काही उपयोग नाही असे म्हणत ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि मुख्य प्रवेश द्वारावरच त्यांनी कॅन्ड मधील डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीसांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पतीने डिझेल ओतून घेतल्याचे पाहुन पत्नीने एकच हंबरडा फोडला. यावेळी महिला पोलीसांनी त्यांनाही धीर दिला. दरम्यान या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपोषण स्थळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटपर्यंत वायबसे डिझेलचे कॅन्ड हातात घेऊन धावत सुटले होते. मात्र एवढे होईपर्यंत तेथील पोलीस कर्मचारी आणि महसुलचे कर्मचारी झोपा काढत होते का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 24 तासात केंव्हाही आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला होता. मग त्यांना रोखले का नाही ? त्यांचे काही बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होते ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

धनगरांना फसवलं, शेतकरी आत्महत्या करतायत; फडणवीसांचं फसवणुकी शिवाय कर्तुत्व काय?

0

मुंबई — मराठा आरक्षणासाठी Maratha reservation मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्च मुंबईच्या आझाद मैदानात Azad maidan पोहोचला. मोर्चा मुंबईत पोहचण्याआधीच भाजपाकडून “इतिहास शिव्यांना नाही तर कर्तुत्वाला लक्षात ठेवतो” अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय? असा प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis  आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवतात, पण त्यांचे कर्तृत्व काय हे त्यांनी सांगावं? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या बॅनरबाजीवर टीका केली. त्यांनी असेही म्हटले की, फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि त्यांना अजून आरक्षण दिलेलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे, हे फडणवीसांचे कर्तृत्व? मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे फडणवीसांचं कर्तृत्व? शेतकरी आत्महत्या करतायत हे फडणवीसांचं कर्तृत्व? असे प्रश्न उपस्थित त्यांनी जोरदार टीका केली.

मनोज जरांगे Manoj jarange Patil म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी अंतरवालीत antarvali आंदोलनाला बसलेल्या आया-बहिणींना जर मारलं नसतं तर आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो. त्या आया-बहिणींवर गुन्हेही त्यांनी दाखल केले, अशी माहिती देतानाच मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी काही लोक मराठ्यांवर बोलतात. त्यामागे त्यांचे काहीही कर्तृत्व नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ Chitra vagh यांनाही टोला लगावला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईत येण्याची शक्यता होती. त्यामुळे याच महामार्गावरील पुलांवर भाजपाने बॅनर लावले होते. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आले होते की, “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो… मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात High court ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.” असे या बॅनरवर लिहिण्यात आले होते. तसेच, या बॅनरच्या खाली प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांची नावे लिहिण्यात आली होती

सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार..! प्यायला पाणी नाही, शौचालयाला कुलपं, हॉटेल्स बंद असले डाव खेळू नका– जरांगे पाटील

0

मुंबई —  आरक्षणाच्या मागणीसाठी  आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस Mumbai policeदलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.

मनोज जरांगे पाटील 7 वाजता पत्रकार परिषद press conference घेतली असून, आझाद मैदानात Azad maidan सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला ही मनोज जरांगे पाटील उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने आता असले डाव खेळू नये आरक्षण द्यावे. आम्ही गोरगरीब मराठ्यांना आरक्षण Maratha reservation मिळाले तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही एक एक दिवस मुदत वाढ दिली तरी उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.

सिद्ध झालं परवानगी सरकार देऊ शकते. मला गोळी मारण्याचे, लोक अडवायचे सगळे सरकारच्या हातात आहे. आमच्या टॉयलेट्सला लॉक लावले आहे बाहेरचे चहाचे हॉटेल्स ही बंद आहेत. प्यायला पाणी नाही, जेवायला नाही, तुम्ही तर इंग्रजा पेक्षा बेकार झालेत. असं ते म्हणाले.

मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे.

मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.

नाटक का खेळले जात आहे. आंदोलनास परवानगी देणे सरकारच्या हातात आहे. मला गोळ्या घालून मारणेही सरकारच्याच हातात आहे. पोरांना अडवायचं का सोडायचं हेही सरकारच्याच हातात आहे. मराठा समाजाच्या मुलांना त्रास न दिल्यास तेही काहीच करणार नाहीत.

मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे. तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.

बीड:सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

0

देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश, डॉ.सारिका क्षीरसागर

बीड — बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh festival मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, ‘कल्पतरू’च्या सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक होते. यंदा गणरायाचे आगमन सर्वत्र अतिशय उत्साहात झाले आहे. यावर्षीही ‘कल्पतरू’च्या kalpataru पुढाकारातून आकर्षक देखावे साकारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. देखाव्यांमध्ये सांस्कृतिक परंपरा ,Cultural traditions ऐतिहासिक, historical धार्मिक religious, आध्यात्मिक ,Spiritual शैक्षणिक, academic वैज्ञानिक आणि स्थानिक ग्रामीण व शहरी जीवनाशी संबंधित सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणे अपेक्षित आहे. अशा देखाव्यांपैकी उत्कृष्ट मंडळास सन्मानित करण्यात येईल.

अशी असतील बक्षिसे; उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख बक्षिस दिले जाणार

पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास १ लाख,

द्वितीय क्रमांकास ७५ हजार,

तृतीय क्रमांकास ५१ हजार व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख रक्कम बक्षिस स्वरूपात दिली जाणार आहे. दरम्यान, हा बक्षीस वितरण सोहळा गणेशोत्सव कालावधीत आयोजित केला जाईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

अशी आहे निवड समिती

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांची निवड करण्यासाठी निरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा.संजय पाटील देवळाणकर, प्रा.सारंग वाघमारे, फामजी पारीख, विद्याभूषण बेदरकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी नोंदणीसाठी श्रीमंत तोंडे ८३२९२५९२९५ व नागेश शेटे ७०५७०२६८७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या, आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त

0

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा देखील शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी रात्री मराठा मुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतून गुरूवारी रात्री अटल सेतूवर हा जत्था दाखल होईल तेथून मुक्तमार्गाने (फ्री वे) आझाद मैदानात रवाना होणार आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे आंदोलन होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कंबर कसली आहे.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात येणार असल्याने तेथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलन स्थळ आझाद मैदान येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात 2 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 6 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 200 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि 1300 पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलन एकत्र येणार असल्याने कुठलेही गालबोट लागू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारचा दिवस पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. गणेशोत्सवातच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारीच मुंबईतील गणेशोत्सव दर्शनासाठी येणार आहेत.

शहा हे मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईतील भाजप नेत्याच्या घरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. शहा यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांची सत्वपरिक्षा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनापूर्वी लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहे.
पालघर, वसई, मधून हजारोंच्या संख्येने आंदोलक

शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबईलगतच्या मिरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर मधूनही हजारोंच्या संख्येने आंदोलक जाणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आमच्या लोकांना ट्रेनने जाण्याच्या सूचना केल्या आहेत, असे आंदोलक शंकर बने यांनी सांगितले. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असेही बने यांनी सांगितले. दरम्यान, गुरूवार दुपारपासून मुंबईत आंदोलनकर्ते दिसू लागले. आझाद मैदान, नरिमन पॉईंट, फोर्ट परिसरात आंदोलनकर्त्याचे जत्थे फिरताना दिसत होते.

अपघाताने एलसीबी ला 21 लाखाचा गांजा पकडण्यात यश

0

बीड — गस्तीवर असलेल्या एलसीबीचे वाहन पाहून कार चालकाने भरधाव वेगाने गाडी पळविल्याने नवगन राजुरी-खालापुरी रस्त्यावर अपघात घडला अन् कारची तपासणी केली असता त्यामध्ये पाच पोते 105 किलो 750 ग्रॅम किंमत 21 लाख 15 हजार रुपयांचा गांजा मिळून आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा नगर जिल्ह्यातून विक्रीसाठी बीड जिल्ह्यात आणण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवगन राजुरी परिसरात तपास करीत होते.यावेळी मारुती सुझुकी कंपनीची सियाझ कार चालकाने पोलिसांचे वाहन पाहून भरधाव वेगाने पळविली, काही अंतरावर गेल्यानंतर राजुरी रस्त्यावर हनुमान वस्तीजवळ सदरील कारचा अपघात घडला, याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी पथकासह जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये 5 काळ्या रंगाचे पोते आढळून आले.त्यामधून गांजा सारखा वास येऊ लागल्याने याची माहिती वरीष्ठांना दिली. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली असता त्या पाच पोत्यांमध्ये 105 किलो 750 ग्राम गांजा मिळून आला. ज्याची किंमत 21 लाख 15 हजार रुपये आहे. तो जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपी बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे रा. चांदा ता. नेवासा व दत्तु मुरलीधर सकट रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत जि. नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गांजा नगर जिल्ह्यातून चांदा येथून बीड जिल्ह्यात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले आहे. यामुळे नगर मधून बीडमध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झाला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनासाठी जाणाऱ्या वरपगावच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

0

केज — मराठा आरक्षण Maratha reservation मागणीसाठी मुंबईला Mumbai निघालेल्या वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने heart attack मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जुन्नर जवळ घडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या मुंबईमधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी वरपगाव येथील 20 कार्यकर्ते मुंबईकडे गेले आहेत.
जुन्नर junnar परिसरात त्यांनी बुधवारी रात्री मुक्काम करुन गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चहा, नाष्टा करुन ते मुंबईकडे जात असताना वाहनातच सतीश ज्ञानोबा देशमुख वय 45 वर्ष यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.सतीश देशमुख यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या एका घटनेत केज तालुक्यातील भाटुंबा येथील प्रा. गणेश धपाटे हे देखील आपल्या मित्रांसह आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. मंचर जवळ चहा पिण्यासाठी उतरले असता रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने त्यांना धडक accident दिली. यामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

पुलावरून पाणी वाहू लागले; चार चाकीसह आडत व्यापारी आणि ऑटो रिक्षा चालक वाहून गेले

0

धारूर — धारूर तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने heavy rain पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वाण नदीला पूर आल्याने रुई धारूर,अंजनडोह या दोन गावा मधील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला तर याच नदीवर आवरगाव जवळ ऑटो रिक्षा सह एक जण वाहून गेला. ऑटो चालकाचा शोध सध्या सुरू आहे.


धारूर dharur  तालुक्यात बुधवारपासून पावसाने जोरदार heavy rain हजेरी  लावली असून झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आले आहेत तर तालुक्यातील सर्वच तळी ओसंडून वाहत आहे.झालेल्या पावसाने वाण नदीला पूर आल्याने तालुक्यातील पूर्वे कडील गावांचा सम्पर्क तुटला आहे.वाण नदीवरील रुईधारूर व अंजनडोह या गावाच्या मधील पुलावर पाणी आल्याने चार चाकी गाडी वाहून गेल्याची घटना घडली.यात अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन कांबळे वय 42 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच वाण नदीवरील आवरगाव वरील पुलावर मध्यरात्री ऑटो चालक अनिल लोखंडे वय तीस वर्ष व ऑटो वाहून गेल्याची घटना घडली या घटनेत ऑटो सापडला आहे मात्र ऑटो चालक अनिल लोखंडे गेल्या 12 तासांपासून बेपत्ता असून प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू आहे. सर्वच नद्यांना,तळ्याना पूरजन्य परिस्थिती Flood situation निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी नाला ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन किल्ले धारूर चे तहसीलदार श्रीकांत निळे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस – महसूल प्रशासनाने केले आहे.