अहमदपूर – अहिल्यानगर महामार्गाचा विकास भेगाळला; कंत्राटदाराचे डांबरी ठिगळ प्रवाशांना मरण जवळ

बीड — बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (NH-548D) ची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भगळी,खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुमारे १७० किमी लांबीचा आणि ८७८ कोटी खर्चाचा हा महामार्गावर प्रवाशांना मरण स्वस्त झाले आहे.अशी प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.


विशेषतः मांजरसुंभा ते पाटोदा या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा, तडे आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केवळ मलमपट्टी; कायमस्वरूपी उपाय नाही

संबंधित कंत्राटदार एचसीपीएल (HCPL) कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम केले जात आहे. मात्र ही दुरुस्ती टिकाऊ नसून काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होत असल्याचे दिसून येत आहे.

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त

दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम (HPM) कंपनीकडील कामही रखडलेले आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि नाले यांची कामे अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासन निष्क्रिय

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यामुळे ठेकेदारांचा बेजबाबदारपणा वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

कायमस्वरूपी उपायांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सिमेंट ब्लॉक कट पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी
अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश
देण्याची मागणी केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles