Home जिल्हा वन्यजीव धोक्यात : वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे ; वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव

वन्यजीव धोक्यात : वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे ; वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव

0
5

बीड – सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नैसर्गिक पाणीस्रोत असलेल्या तलाव, साठवण तलाव आणि धरणांतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी, सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत.

यामुळे हरीण, मोर, लांडोर, वानर आदी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे तसेच गाव तलावांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

वनविभागाने तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात नाही. काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.

वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचा तसेच अज्ञात वाहनांच्या धडकेत जीव गमावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे स्वच्छ पाणी सोडून वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here