
बीड — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ खरवंडी ते नवगन राजुरी रस्त्यासंबधी आ.संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी मुद्दा उपस्थित करीत या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. हा रस्ता पूर्ण होणार की, नाही ? रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून याची आयआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांची चौकशी करण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा १८ महिन्यांचा होता. मात्र ९ वर्ष झाले तरी हा रस्ता अपूर्ण असून, आजही २५ टक्के काम राहिलेले आहे. तसेच या रस्त्याचे काम करणान्या कंत्राटदाराला ६० टक्क्यांपेक्षा जास्त रकम देण्यात आली आहे. काम रखडण्याचे कारण कोरोना आणि भूसंपादन असल्याचे सांगितले जात आहे. पण कोरोना काळ हा दोन वर्षांचा होता, तर १० टक्के भूसंपादन राहिले आहे. राष्ट्रीय महामार्गाची वर्क ऑर्डर निघण्याआधी पूर्ण होत असते तरीही यात हलगर्जीपणा झाला आहे. १० टके भूसंपादन ९ वर्षात पूर्ण करु न शकणारे अधिकारी, कर्मचारी याला कारणीभूत असल्याच सांगितले आहे. तसच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र त्याचा मोबदला ही मिळाला नसल्याचे आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या लक्षवेधी सूचनेत सांगताना रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून यापेक्षा पाणंद रस्ता बरा असे सांगत याची आयआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, यासोबतच हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावर मंत्र्यांनी उत्तर देताना भूसंपादन मावेजासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली असून, येत्या मे महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्याकडे पदवी नसतानाही कार्यकारी अभियंता पदाचा, अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली. याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्याचीही घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची केली मागणी
बीड शहरापासून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज पांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याठिकाणी काही दिवसांत उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर या पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी याच लक्षवेधी मांडताना केली. याला ही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.




