बीड — यावर्षी अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी वर्ग उध्वस्त केला आहे.पिकं पाण्याखाली गेल्याने केलेला खर्चही निघाला नाही. त्यातच कपिलधारवाडी मध्ये भूस्खलन झाल्याने ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. याच विस्थापितांच्या मुखी दिवाळीचे गोडधोड जावे या उद्देशाने “ब्राह्मण एक सुधारक” या व्हाट्सअप ग्रुपने आज फराळाचे वाटप केले.

यावर्षी अतिवृष्टी झाल्याने पूरबाधित शेतकरी पीक नुकसानीमुळे दिवाळी कशी साजरी होणार? वर्षभर जगायचं कसं? पेरणीसाठी घेतलेला पैसा फेडायचा कसा? या प्रश्नात अडकलेला आहे. हे संकट कमी की काय म्हणून कपिलधारवाडीकर भूस्खलनाने भयभीत झाले आहे. येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागायचा आहे.अशावेळी विस्थापित झालेल्या या ग्रामस्थ बंधूंच्या घरात दिवाळी साजरी होण अवघड होऊन बसलं आहे. दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घासातला घास यांना देणं ही आपली जबाबदारी आहे.




