राजकीय

पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्याला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे — बजरंग सोनवणे 

धारूर — बहुरंगी कोण आहेत ? हे सांगण्याची गरज नसून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्यालाच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या टीकेला दिले.
 भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बीड येथे झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्च्क्तक टीका केली होती. गुरुवारी धारूर तालुक्यात प्रचारादरम्यान फिरत असताना बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या वैयक्तिक टिकेबद्दल त्यांचा समाचार घेताना म्हटले की, आपल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा बहुरंगीपणा हा फक्त बीड जिल्ह्यालाच माहीत नव्हे तर अख्या महाराष्ट्राला माहित आहे. ते किती बहुरंगी आहेत ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही अशी चपराक त्यांनी लगवली आहे. धारूर तालुक्यात अनेक गावांना भेटी देत बजरंग सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे व इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button