मुंबई – राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची नावं बदलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदार पूनर्रचने नंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतदारसंघाची नावे बदलणार आहे.
छ.संभाजीनगर जिन्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदार संघांच्या नावामध्ये बदल होणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशन नंतर ही नावे बदलण्यात येणार आहेत.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे नाव होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या तीन मतदारसंघाची नावे देखील बदलली जाणार आहेत.अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे नामकरण होणार आहे.मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन)असतो.डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे.
लोकसभा निवडणुकी नंतर मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे, याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसर्या संक्षिप्त पुनर्निक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकाशित केली आहे. वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

