संदीप क्षीरसागर चुलत्याच्या मताधिक्याचा विक्रम मोडीत काढणार!

बीड — विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं प्रचंड बदलली असून संदीप क्षीरसागर प्रचंड मतांनी विजयी होतील अस चित्र निर्माण झाला आहे. 2009 च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी 70 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांचा हा विक्रम संदीप क्षीरसागर मोडीत काढणार असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत आहे.

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत गेला तस तसं राजकीय समीकरणं बदलू लागली. अजित पवार गटातील राष्ट्रवादी चे डॉ.योगेश क्षीरसागर यांना काही प्रमाणात अनुकूल असणारे वातावरण होते. त्यामुळे दोन्ही भावात होणारी लढाई चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मनोज जरांगे पाटील बीडला येऊन गेल्यानंतर प्रतिकूल बनू लागले. मराठा समाजामध्ये उमेदवार जातीचा असल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम जरांगे पाटलामुळे दूर झाला गेला. त्यामुळे नेहमीच मराठा आरक्षणाला साथ देणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल अनुकूल बनला. लोकसभेचा निवडणूक निकाल बदलवण्यात कारणीभूत ठरलेल्या बालाघाटावर तर संदीप क्षीरसागर यांच्यासाठी एकतर्फी परिस्थिती अनुकूल बनू लागली. पूर्वीपासूनच भाजप विरोधात असलेला मुस्लिम समाज देखील संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू लागला.ओबीसी मतदार हे दोन्हीही उमेदवार ओबीसी असल्याने काही प्रमाणात विभागला गेला असला तरी, संदीप क्षीरसागर यांना तो जास्त प्रमाणात पूर्वीपासूनच झुकलेला आहे. एकंदरच बीड मतदार संघाची परिस्थिती पाहता यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी 2009 च्या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान पदरात पाडून जवळपास 70 हजाराची आघाडी घेतलेली होती. तीच स्थिती पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत निर्माण झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर आपले चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढतील असं जनतेतून बोललं जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles