Sunday, December 14, 2025

शेतकऱ्यांच स्वस्त केलयं मरण; पांचटपणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन?

बीड — बहरलेल्या पिकात उभा केलेलं बुजगावणं किमान राखणीच तरी काम करत जी बुजगावण्याला किंमत आहे. ती किंमत देखील आपल्याला नसल्याचं चित्र जिल्ह्याचा करता ,करविता, न्यायाचं तराजू हातात घेणाराच जिल्हाधिकारी निर्माण करत असेल तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच मरण केलय स्वस्त; पांचट पणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन चा कारभार मस्त असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. घटनाही तशीच घडली आहे.


जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्ह्यात आले. येताच वर्तमानपत्रातून जनता दरबाराची घोषणा करून स्टंटबाजी निर्माण केली. जस जसा जनता दरबार भरू लागला. तसं तसं एकेक हास्यास्पद घटना घडामोडी समोर येऊ लागल्या. यातून शेतातल्या बुजगावण्याला किंमत असते ती देखील न ठेवण्याचा विडा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उचलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर हे जिल्हाधिकाऱ्यांनी भरवलेल्या जनता दरबारात उपस्थित राहिले. बीड जिल्ह्यात 115 दिवसात 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी मदत मिळाली नाही या संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. तर त्यांनाच मदत द्यायला काही हरकत नाही. देऊन टाका मोबदला? असं पांचट उत्तर दिलं. इतर जनतेच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांना वाचून दाखवतो हे चित्र देखील पाहायला मिळाले.मग जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्याचा विसरले होते काय? असा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी थिल्लर पणाचा कळस गाठला. याच जनता दरबाराचा आणखीन एक किस्सा समोर आल्याने बुजगावण्याची किंमत देखील आपल्याला नसल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सप्रमाण सिद्ध केलं.

पाटोदा तालुक्यातील पाचेगाव चे शेतकरी पवनचक्की कंपनी व पोलीस यंत्रणेच्या जात्यात भरडून निघत आहेत. शेतकऱ्यांना मावेजा न मिळणे एकसारखा मावेजा न देणे, धनादेश न वठणे, पोलिसासह पवनचक्की कंपनी व त्यांच्या गुंडांकडून होणाऱ्या दादागिरी विरोधात बुधवार दि. सात मे रोजी आक्रमक झाले. पाटोदा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडकेने अतिरिक्त कुमक बोलवत मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या संदर्भात आपल्याला न्याय मिळावा अशी पाचेगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर अर्ज करून मागणी केली. आता या प्रकरणाला न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गुरुवारच्या जनता दरबारात शेतकऱ्यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांना ही वाटले की जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी, पवनचक्की कंपनी यांच्याशी बोलून तात्काळ प्रश्न मार्गी लावतील. पण कशाच काय? विवेक जॉन्सन यांनी थाटात शेतकऱ्यांना जनता दरबाराला बोलावलं. बिचारे शेतकरी आठवडी बाजाराचं काम सोडून किरायाने गाडी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हजर झाले. जिल्हाधिकारी यांना भेटून मावेजा न देताच पवनचक्की कंपनी तारा ओढत असून पवनचक्कीचे काम मावेजा मिळेपर्यंत थांबवावे अशी कळवळून विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. पण जनता दरबार भरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपण जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसलो आहोत याचा विसर पडला. पवनचक्की कंपन्यांनी सशुल्क संरक्षण मागितले असल्याने मला काम थांबवता येत नाही असं म्हणत तुम्ही पाटोदा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटून ते ठरवतील तो मावेजा घ्या मला यात काहीही करता येत नाही.माझ्या हातात नाही असे सांगितले. असा निर्लज्जपणाचा सल्ला देत शेतकऱ्यांना वाटी लावलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातातच काही नव्हतं. तर मग जनता दरबाराला खर्च करून शेतकऱ्यांना यायला का लावलं? असा प्रश्न विचारला जात आहे. बुजगावण्याची किंमतही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना नाही काय? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. अविनाश पाठक नावाचा खोकला जाऊन विवेक जॉन्सन नावाचा पडसं आल्याचं शेतकऱ्यांमध्ये बोललं जाऊ लागला आहे. विवेक जॉन्सन यांचा जनता दरबार म्हणजे पांचटपणाची स्टंटबाजी असल्याचं बोललं जाऊ लागला आहे. विवेक जॉन्सन म्हणजे बोकडाच्या गळ्याला लोंबकळणार स्तन असल्याची खमंग चर्चा रंगू लागली आहे. यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच “स्वस्त केलय मरणं; पांचटपणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन “असं डोक्यावर हात मारून म्हणण्याची वेळ आली आहे.

असा पांचटपणाचा कळस कधीच पाहिला नाही !

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आपण जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्याचं विसरल्याचे अनेक किस्से जनता दरबारात पाहायला मिळतात. विवेक शून्य असलेला हा माणूस व त्याचा जनता दरबार म्हणजे पांचटपणाचा कळस असल्याचा अनुभव येत आहे. परिस्थितीच घटनेचं गांभीर्य नसलेला जिल्हाधिकारी पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या माथी मारला आहे. यातून जिल्ह्याच्या विकासाची तळमळ पालक मंत्र्यांना नसल्याचं दिसत आहे. इतका अंदा धुंद असलेला कारभार यापूर्वीच्या काळात कधीच आला नाही.
        डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर,
                सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles