Home क्राईम वाटमारी करणारी टोळी एलसीबीने तीन दिवसात जेरबंद केली

वाटमारी करणारी टोळी एलसीबीने तीन दिवसात जेरबंद केली

0
83

बीड — डोळ्यात मिरचीची पूड टाकून सायंकाळच्या सुमारास तरुणाची अंगठी व चैन लुटल्याची घटना परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडली होती.स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करीत फक्त तीनच दिवसांत या टोळीला गजाआड केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेला मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
धारावती तांड्याकडे निघणाऱ्या कालरात्री मंदिराजवळ एका तरुणाला चार जणांनी पाठलाग करून अडविले. यावेळी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्याकडे सोन्याची अंगठी आणि लॉकेट लंपास केले. यात परळीच्या ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु
केला. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सूतळे व त्यांच्या टीमला या गुन्हयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंकज तुकाराम उगलमुगले वय 25 वर्ष, रा. पांगरी, ता. परळी, वैभव राम बिडगर वय 20 वर्ष, रा. दाऊतपूर, ता. परळी, शामसुंदर बाळासाहेब फड रा. मरळवाडी, ता. परळी आदित्य सुरेश उपाडे वय 20 वर्ष, रा. सिद्धार्थ नगर, परळी याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईत चोरीला गेलेली चैन, अंगठी, मोटार सायकल, स्कुटी व कोयता असा एकूण 1 लाख 58 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे यांच्या टीमने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here