राहू,केतू शनिच्या फेऱ्यातले बांधकाम कामगार मीठ मिरचीतच त्रस्त; त्रिकूटानेच केल्या योजना फस्त

बीड — दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बांधकाम मजुरांच्या पाल्यांच कल्याण व्हावं. त्यांनी मुख्य प्रवाहात यावं, कुठेतरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.मात्र मीठ मिरचीची सोय करण्यातच व्यस्त असलेल्या मजुरांच्या कुंडलीत बसलेल्या त्रिकूटांनी शासनाच्या योजना फस्त करण्याचा व मजुरांचं जीवनमान उध्वस्त करण्याचा विडा उचलल्याचं चित्र कामगार कार्यालयात निर्माण झालं आहे.
बीडचं कामगार कल्याण कार्यालयात राहू,केतू ,शनि बनून
आपण कसाही नंगानाच केला तरी “सुधा” कोनाले”च काही फरक पडत नाही. कोणालाच काही कळत नाही.मग मन मानेल ते “कर”त रहा हा विचार करत “नीती” न ठेवता पाण्यावर घि(तूप) काढताना खऱ्या बांधकाम मजुरांना फायदाच होणार नाही. या योजना “गे” (षंढ)ठराव्यात व चव”हाणत त्या आपल्यालाच वरपता याव्यात याची काळजी घेतली जात आहे. अगदी बिनदिक्कत हा सगळा खेळ सुरू आहे. विशेष म्हणजे कार्यालयात काम करणार त्रिकूट कमी की काय म्हणून आणखी एजंटा सारख्या ग्रहासोबत देखील त्यांनी युती केली आहे. यांच्या मर्जी शिवाय कागद पुढे हलत नाही. मीठ मिरची मध्ये व्यस्त असलेल्या कामगारांना त्रुटींच्या जाळ्यात अडकून पुन्हा नव्या फेऱ्यात टाकलं जातं. तीन पाप ग्रहाला पूरक असलेला एजंटासारखा चौथ्या ग्रहाची भरभक्कम दक्षिणा देऊन शांती केली तरच कुठेतरी या पापग्रहांची कृपादृष्टी मजूरांवर होते. नाहीतर सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम कामगारा ऐवजी चांगल्या चांगल्या घरातल्या स्वतःला प्रतिष्ठित म्हणवून घेणाऱ्या लोकांचाच यात समावेश आहे. त्यांचा समावेश सहज सुलभ व्हावा यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे बनावट सही शिक्यांची देखील सोय ऑफिसमध्ये कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. शिष्यवृत्ती, लग्नाचे अनुदान, वारस मदत याबरोबरच भांड्याकुंड्याचा दिला जाणारा सेट यामध्ये मोठी रक्कम या तीन पापी ग्रहांच्या चरणी अर्पण करावी लागते. त्यानंतर यांची कृपा कुठेतरी मिळते. अन्यथा खऱ्या लाभार्थींना याचा फायदा होणं दुरापास्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांधकाम मजुरांच्या योजना त्रिकुटांच्या फेऱ्यात अडकल्याने बांधकाम मजुरांच्या हालाखीत कुठलाच फरक पडला नाही. मात्र लाखो रुपयांच घबाड मिळवून हे त्रिकूट गब्बर होत असतानाच चित्र निर्माण झाल आहे.