बीड — बालाघाटावरील प्रसिद्ध उद्योजक तथा “राधिका हॉटेल”चे मालक सुग्रीव अण्णा रसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
बालाघाटावरील मांजरसुंबा या ठिकाणी “राधिका हॉटेल”स्थापन करून हॉटेल व्यवसायात सुग्रीव रसाळ यांनी चांगला जम बसवला होता. सावकार या नावाने देखील ते बालाघाटावर प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून “सह्याद्री माझा” रसाळ कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

