बीड — पाटोदा तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच विजया नागरगोजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. या ठरावाला ग्रामसभेची मंजुरी घेण्यासाठी गुप्त मतदाना ऐवजी खुले मतदान घेण्यासाठी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी लोकशाहीची थट्टा लावत संविधानाला बट्टा लावण्याच काम केलं आहे. त्यामुळे गावात गेल्या तीन ते चार तासापासून तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे.
मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत संविधान आणि लोक मताचा अनादर करण्याचा चंग गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी बांधला आहे. विशेष म्हणजे नुकतीच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. त्याच आंबेडकरांच्या शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. या शिकवणीला वानखेडे काळीमा लावत असल्याचे चित्र येवलवाडीत निर्माण झाला आहे. अधिकार पदावर बसल्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण विसरून राजकारणाची पाया चाटण्यात ते धन्यता मानत आहेत. सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतर ग्रामसभेच्या मंजुरीसाठी गुप्त मतदान घेण्याची तयारी प्रशासनाने केली. त्यासाठी मतपत्रिका ही गावात आणल्या गेल्या. मात्र ऐनवेळी वानखेडे यांनी वेशीत घोडं अडवलं. गावकरी गुप्त मतदानाचा आग्रह करत असताना लोक मत पायदळी तुडवत हम करे सो कायदा ही भूमिका त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आक्रमक गावकऱ्यांना हा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा आदेश असल्याचं ते सांगत आहेत. खुल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली तर येणाऱ्या काळात यांचा त्रास ग्रामस्थांना भोगाव लागणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना वानखेडे मात्र लोकांचे मुडदे पाडण्याचं षडयंत्र रचत आहे. कायदा सुव्यवस्थेची लत्तर वेशीवर टांगून बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं पाताळ यंत्री धोरण अवलंबलं आहे. येवलवाडीतील मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना वेळीच समज देऊन त्यांचे अधिकार काढून घ्यावेत कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हस्तक्षेप करून खुल्या पद्धतीने होणारी मतदान प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.

