बीड — तालुक्यातील सुलतानपूर ते माळेवाडी हा सार्वजनिक रस्ता चार वर्षांपासून अतिक्रमण आणि वादात अडकून पडला होता . या रस्त्यामुळे गावातील जनतेचे रोजचे जगणे अवघड झाले होते . शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागत होता . आजारी माणसांना दवाखान्याचा रस्ता बंद झाला होता . विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना रोज अडचणी येत होत्या . गावकरी वैतागले होते , पण प्रश्न काही सुटत नव्हता .
या रस्त्याबाबत मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 अन्वये रस्ता खुला करण्याचे आदेश याआधीच झाले होते . मात्र काही लोकांनी अडथळे घातल्याने प्रत्यक्षात रस्ता खुलाच होत नव्हता . अखेर बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली आणि अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट आदेश दिले .
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सार्वजनिक रस्ते आणि शासकीय मालमत्ता याबाबत कोणतीही तडजोड नको , असे स्पष्ट आदेश दिले आहेत . बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करताना कुणालाही पाठीशी घालू नये , अशी ठाम भूमिका घेतली आहे . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येतो .
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते . बीड उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी सार्वजनिक रस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल , असा इशारा दिला आहे .
कारवाईदरम्यान महसूल , पोलीस आणि ग्रामपंचायत यंत्रणा एकत्र आल्या . नेकनूर पोलिस स्टेशनचे बीट अमलदार सचिन मुरुमकर यांच्या पथकाच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात आले . ग्राम महसूल अधिकारी शिवराम येवले , मंडळ अधिकारी दिनकर जायभाय , महसूल सेवक बाबासाहेब बिरलींगे आणि ललित काकडे यांनी सलग ठाण मांडून रस्ता मोकळा केला . विशेषतः उसाची वाहतूक आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी हा रस्ता खुला झाल्याने महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले .
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांमध्ये समन्वय साधत प्रशासनाला सहकार्य केले .या संपूर्ण प्रकरणात सरपंच अनिल शेंडगे यांनी गावकऱ्यांची बाजू सांभाळत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले . अखेर महसूल प्रशासन , पोलीस यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्या एकत्र प्रयत्नातून चार वर्षांपासून अडलेला प्रश्न एका दिवसात सुटला .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की , सार्वजनिक रस्ते , शासकीय जमिनी किंवा वहिवाटीचे मार्ग अडवणाऱ्यांना अजिबात माफ केले जाणार नाही . अशा प्रकारांची माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनाला साथ द्यावी , असे आवाहन केले आहे .
विशेष म्हणजे गेवराई, गंगापूर , पैठण , घनसावंगी आणि अंबड येथे तहसीलदार म्हणून काम करत असतानाही चंद्रकांत शेळके यांनी रस्त्यांची कामे प्राधान्याने केली होती . बीडमध्ये आल्यानंतरही त्यांनी हीच वाट धरली आहे . मागील एका वर्षात त्यांनी जवळपास शंभर किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त करून जनतेसाठी खुले केले आहेत . त्यामुळे गावोगाव त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत असून , सामान्य माणसातून त्यांचे आभार मानले जात आहेत .


Lovely just what I was searching for.Thanks to the author for taking his clock time on this one.
Have you ever thought about including a little bit more than just your articles? I mean, what you say is valuable and everything. Nevertheless think of if you added some great visuals or video clips to give your posts more, “pop”! Your content is excellent but with images and video clips, this site could certainly be one of the best in its niche. Awesome blog!