Sunday, December 14, 2025

पावसाने कांद्याचे नुकसान; आर्थिक संकटातील शेतकऱ्याची आत्महत्या

आष्टी — अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणी केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . यातूनच एका शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना लिंबोडी येथे रविवार एक जून रोजी सायंकाळी घडली. गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचं नाव आहे.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष यांनी आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामूळे हाताशी आलेला कांदा वाहून गेला. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे आर्थिक संकट ओढवल्याने डोक्यावरचे उसनवारी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आंधळे होते. यातूनच शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळच्या दरम्यान शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles