बीड — महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना बीड शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी आज पहाटे नगर रोडवरील सामाजिक न्याय भवन आदि ठिकाणी असणारी चहाचे हातगाडे, टपरीधारक तसेच फुल विक्रेते, आदि हातावर पोट भरणा-या गोरगरिबांच्या साहित्यांची नासधूस करून वाहनात टाकुन घेऊन जाण्याची मर्दुमकी नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी दाखवली वाहतुकीस अडथळा अथवा अपघाताला निमंत्रण न करणारी गोरगरीबांचे हातगाडे,टपरी उचलून नेताना बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमित बांधकामे त्याच बरोबर बिंदुसरा नदीपात्रात फ्लड झोन ,पुर रेषेत असणारी अतिक्रमित बांधकामे,भु माफियांनी नगरपरिषद आधिका-यांशी संगनमताने केलेली प्लॉटिंग याकडे सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना यांनी दिलेले निवेदने व आंदोलने याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाने भूमिका घेऊ नये सर्वांना समान न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि.12 बुधवार रोजी दुपारी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ .गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, बीड जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना नितीन सोनवणे, बीड शहर सचिव वंचित बहुजन आघाडी संदिप जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष राजु कांबळे , शेख मुस्ताक , आबासाहेब जगताप, शेख अकबर आदी सहभागी होते. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.
दोन मुलांचे शिक्षण आणि घर कसं चालवायचं? — चहा टपरी चालक अकबर शेख
नगर रोडवरील सामाजिक न्याय भवनासमोर शेख अकबर यांची कित्येक वर्षांपासून चहाची टपरी आहे.दोन मुले एक आठवी आणि दुसरा ६ वीत शिकत आहेत. बालेपीर भागात राहणारे शेख अकबर यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यावरच चालायचा आज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी टपरी तोडुन मोडुन गाडीत टाकून घेऊन गेले आता पुढे घर चालवायचे कसं असा त्यांना प्रश्न पडला आहे.
बीड शहरातील जाणाऱ्या ठिकाणी बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकाम आहेत.जर १९८९ सारखी पुरस्थिती निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जिवितहानी होऊ शकते.नगरपरीषदेने सीमा रेषा आखून देणे,फ्लड झोन,ग्रीन झोन,रेड झोन, यल्लो झोन आदी बाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार निवेदने आणि आंदोलने केलेली आहेत मात्र याकडे जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन मुग गिळून गप्प असुन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.मात्र त्याचवेळी गोरगरिबांच्या टपरी आणि हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात धन्यता मानत आहे.ही भुमिका दुटप्पी असुन याच आम्ही निषेध करत आहोत.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर ,
सामाजिक कार्यकर्ते

