बीड — जनता वाऱ्यावर सोडून स्वतःचा केलेला विकास, मतदारसंघाचा विकासाचा उडालेला बोजवारा, पुतण्याला दिलेला दगा, मराठा आरक्षण काळात घेतलेली वादग्रस्त भूमिका यामुळे प्रकाश सोळंके यांच्या पायाखालची जमीन सरकली असून मगरीचे अश्रू ढाळत सहानुभूती मिळविण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागल्याचं पाहायला मिळत आहे.
माजलगाव मतदार संघ तसं पाहिलं तर बागायतदारांचा भाग मात्र रस्त्या अभावी अनेकांची हाड खिळखिळी झाली आहेत. ऊस बागायतदार कारखान्याच्या माध्यमातून अक्षरशः चरखा मध्ये घालून पिळून काढण्याचं काम आज पर्यंत सोळंके यांनी केलं. पेशवाईच्या राजवस्त्रासाठी (आमदारकी)रघुनाथराव पेशव्यांसारखं पुतण्याचाच राजकीय केलेला घात. इतकी वर्ष निर्विवाद आमदारकी भोगल्यानंतर देखील खुर्चीची न सुटलेली हाव या प्रकाराला कारणीभूत ठरली, मराठा आरक्षण आंदोलनात वापरलेली मग्रुरी ची भाषा यासारख्या अनेक घटनांमुळे प्रकाश सोळंकेच्या पायाखालची जमीन ऐन निवडणूक काळात सरकली आहे. मागच्या निवडणुकीत रमेश आडसकर यांच्याकडून थोडक्यात पराभूत होता होता वाचले. या निवडणुकीत मात्र प्रकाश सोळंकेच्या कारनाम्यांनी कळस गाठला. एवढंच नाही तर पत्रकारांच्या बाबतीत देखील त्यांनी आपली मग्रुरी दाखवण्याचं काम केलं.त्यामुळे प्रकाश सोळंके आता तरी नको रे बाबा असं मतदार म्हणू लागले आहेत.
वातावरण विजयासाठी अनुकूल बनत नसल्याने शेवटी अश्रू गाळत दुःख व्यक्त करण्याचं मोठ भावनिक हत्यार त्यांनी बाहेर काढला आहे. पण आतापर्यंत त्यांच्या कारभारामुळे जनतेच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला मी विरोध केला नव्हता मी एकाही आंदोलका विरोधात तक्रार दिली नव्हती. माझं घर जाळलं असं म्हणत भावनिक मुद्दे उपस्थित करून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या भावनिकतेला भरडली गेलेली माजलगावची जनता भिक घालणार नसल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे.

