मुंबई — मराठा आरक्षणासाठी Maratha reservation मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्च मुंबईच्या आझाद मैदानात Azad maidan पोहोचला. मोर्चा मुंबईत पोहचण्याआधीच भाजपाकडून “इतिहास शिव्यांना नाही तर कर्तुत्वाला लक्षात ठेवतो” अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय? असा प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवतात, पण त्यांचे कर्तृत्व काय हे त्यांनी सांगावं? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या बॅनरबाजीवर टीका केली. त्यांनी असेही म्हटले की, फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि त्यांना अजून आरक्षण दिलेलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे, हे फडणवीसांचे कर्तृत्व? मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे फडणवीसांचं कर्तृत्व? शेतकरी आत्महत्या करतायत हे फडणवीसांचं कर्तृत्व? असे प्रश्न उपस्थित त्यांनी जोरदार टीका केली.
मनोज जरांगे Manoj jarange Patil म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी अंतरवालीत antarvali आंदोलनाला बसलेल्या आया-बहिणींना जर मारलं नसतं तर आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो. त्या आया-बहिणींवर गुन्हेही त्यांनी दाखल केले, अशी माहिती देतानाच मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी काही लोक मराठ्यांवर बोलतात. त्यामागे त्यांचे काहीही कर्तृत्व नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ Chitra vagh यांनाही टोला लगावला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईत येण्याची शक्यता होती. त्यामुळे याच महामार्गावरील पुलांवर भाजपाने बॅनर लावले होते. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आले होते की, “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो… मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात High court ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.” असे या बॅनरवर लिहिण्यात आले होते. तसेच, या बॅनरच्या खाली प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांची नावे लिहिण्यात आली होती

