बीड — नेकनूर पोलीस ठाणे (neknoor police) हद्दीत खेडोपाडी (rural area)उघडलेल्या धाब्यांमधून (dhaba)अवैध दारूची सर्रास विक्री केली जात आहे. यामध्ये गोवा राज्यातून (Goa)तस्करी केलेली दारू देखील उपलब्ध होऊ लागली आहे. तीच स्थिती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील(National Highway) धाब्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. यातून पोलीस (police)ठाण्याला मोठी कमाई होत असली तरी गरिबांची घरं उध्वस्त होऊ लागली आहेत. एकूणच ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींचा नेक नूर राहिला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नेकनूर हे पोलीस ठाणं पूर्वीपासूनच कमाईच मोठ ठिकाण मानलं जातं. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (SP Navneet kavat)सारखा प्रामाणिक अधिकारी जिल्ह्यात आल्यानंतर काही काळ नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना थोडा लगाम लागला होता. मात्र पोलीस अधीक्षकांचा आपल्या अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास सध्या तरी धोकेदायक ठरू लागला आहे. याचं सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे नेकनूर पोलीस ठाणे होय. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धाबे(dhaba) उघडण्यात आले आहेत. या धाब्यांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होऊ लागली आहे. याला कुठलाही लगाम घालण्याचं काम केलं जात नसल्याने गोरगरिबांची घरं मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. तरुण पिढी (young generation)दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनाची राखरांगोळी करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. मागेल तिथे दारू मिळत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा(law and order) प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तळीरामांच्या शिव्यांच्या लाखोळीला रस्त्यावरून जाणाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकट्या चौसाळा (chausala) शहराचाच विचार केला तर बस स्थानका जवळ चार ते पाच ठिकाणी अवैध दारू तसेच बनावट ताडी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग प्रत्येक धाब्यावर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर दारूचा प्रत्येक ब्रँड (brand)ग्राहकांच्या सेवेला उपलब्ध होऊ लागला आहे. तो देखील दीडपट दराने.दारू विक्रेते मात्र यातून कोट्याधीश होत असले तरी गोरगरिबांची संसार मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. या संदर्भात तक्रार करायची तर कोणाकडे हा देखील मोठा प्रश्न आहे. शेतातला माल चोरीला गेला तर त्याची तक्रार नोंदवून घेतली जात नाही गुन्हा दाखल होत नाही. पोलीस अधीक्षकांचा (Sp)फोन गेला गुन्हा दाखल करा म्हणून तरीही त्यांचा आदेश मानला जात नाही. इतकी मग्रुरी ठाणे प्रमुखांकडून दाखवली जाते. या मग्रुरीचा अनुभव चौसाळा परिसरातील फळबाग चोरीच्या घटनेतून जनतेला लिंबागणेश परिसरातून विद्युत पंप चोरीला गेले दोन महिन्यापासून तक्रार दिली याची सुद्धा दखल गोसावी ला घ्यावी वाटली नाही. बरं हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत घडलं होतं. सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल हे सांगणं अवघड आहे. विद्युत मोटारी चोरीची बातमी माध्यमामधून समोर आल्यानंतर मात्र गुन्हा दाखल केला. जर ही स्थिती असेल तर अवैध दारूची तक्रार कोण आणि कशी घेणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरच गोसावींच्या कारकीर्दीत अवैध दारू विक्रेत्यांसह चोरट्यांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. यातून ठाणे प्रमुखाला मोठ्या प्रमाणावर खळ मिळत असलं तरी सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत हे प्रामाणिक अधिकारी असले कर्तव्यदक्ष जरी असले तरी आशा मुजोर अधिकाऱ्यांच्या कर्तबगारिने मात्र पोलीस दलावर शिंतोडे उडले जातात यामुळे अशा धंद्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

