बीड — पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या पायावर अविनाश पाठक यांनी आपल्या पूर्ण निष्ठा वाहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं एवढंच धोरण पा”ठकां”नी अवलंबलेलं आहे. मात्र हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यामुळे त्यांची झोप हराम झाली आहे. ते एवढे धास्तावले आहेत की स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
पवन ऊर्जा कंपनीच्या जांगडगुत्त्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक पुरते अडकले आहेत. शेतकऱ्यांची बाजू घ्यावी तर कंपन्यांच्या पायी निष्ठा वाहिल्यामुळे आलेला मिंधेपणामूळे मानसिक स्वास्थ्य हरवत चालल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी खाजगीत सांगू लागले आहेत. कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावताना पा”ठकां”नी केलेली मदत. या मदतीमुळे शेतकऱ्यांचे तळतळाट माध्यमांची ओरड यामुळे एखादा कर्मचारी केबिनमध्ये येताच त्याच्यावर कारण नसताना खेकसने, अंगावर धावून जाणे असे प्रकार त्यांच्याकडून घडू लागले आहेत. ज्या शेतकऱ्याने साहेब तुम्ही कंपनीचे दलाल आहात का? असा प्रश्न विचारला होता. तोच शेतकरी कैफियत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला असता त्याला देखील या परिस्थितीचा सामना करावा लागला. याची रंगीत चर्चा चौसाळा परिसरात होऊ लागली आहे. कहर म्हणजे कहर म्हणजे स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा भरवसा पा”ठका”ना वाटेनासा झाला आहे. काम घेऊन आलेल्या रोज सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासण्याचे काम देखील ते सध्या करू लागले आहेत. “सह्याद्री माझा”शी नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने आपली आपबीती सांगितली. यातून जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खाजगी जीवन देखील पा”ठकां”च्या मोबाईल तपासणीमुळे धोक्यात येऊ लागले आहे. एकंदरच कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय थट्टामस्करीचा बनत चालला आहे.