Sunday, February 1, 2026

आष्टीतील चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा दणदणीत विजय

बीड — आष्टीत झालेल्या चौरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष झालेल्या बंडखोरीमुळे लागले होते. भीमराव धोंडे यांनी निवडणुकीत शड्डू ठोकली तर आ. बाळासाहेब आजबे ,मेहबूब शेख यांनी देखील उडी घेतली होती मात्र या निवडणुकीत सुरेश धस यांनी सरस कामगिरी करत 77 हजार 732 अशा विक्रमी मताधिक्याने भीमराव धोंडे यांना मात दिली.

भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केल्यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघातील वातावरण देखील त्यांच्यासाठी प्रचंड अनुकूल बनले होते. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या अटकली बांधल्या जात होत्या. मात्र मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी सुरेश धस यांनी मतदार संघातील वातावरण अनुकूल करून घेण्यात यश मिळवले. सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी देखील साथ दिली नाही. ओबीसी मतदारांचा चांगला प्रभाव या मतदारसंघावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना भाजपला लोकसभेला केलेली मदत यामुळे सुरेश धस यांना मराठा मतदारांचा देखील विरोध होता. बंडखोर उमेदवार ओबीसी असल्याने अडकित्यात अडकल्यासारखी परिस्थिती सुरेश धस यांची निर्माण झाली होती. मात्र मातब्बर राजकारणी असल्याने त्यांनी या कात्रीतून सोडवनूक करून घेतली.
या निवडणुकीत सुरेश धस यांना एक लाख 38 हजार 638 इतकी मतं मिळाली. दुसऱ्या नंबर वर असलेल्या भीमराव धोंडे यांना साठ हजार 906 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांना 52 हजार 37 मत मिळाली. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे एकवीस हजार 332 मतांनी चौथ्या क्रमांकावर राहिले गेले. या निवडणुकीत सुरेश धस यांना 77 हजार 732 मतांनी दणदणीत विजय मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles