Sunday, December 14, 2025

योगेश भैया..! स्व. काकूंच्या विचाराला मूठ माती दिली मग सामाजिक,सांस्कृतिक चळवळीचा चेहरा असलेल्या दीपाताई क्षीरसागर प्रचारापासून अलिप्त का?

बीड — राजकारणा सोबतच नाट्य, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचा चेहरा असलेल्या दीपाताई क्षीरसागर यांनी बीडच्या सर्वांगीण विकासात मोलाचा हातभार लावला. त्या मात्र या वेळेच्या न.प. निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त का? बीडच्या विकासात या चळवळीचं महत्व नाही का? स्व. काकूंच्या विचारधारे सारखीच सांस्कृतिक चळवळींना देखील मूठ माती देत झुंडशाहीला बळकटी द्यायचीय का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.
बीड शहर तसं सांस्कृतिक वारसा जोपासणारं आहे.डॉ. भारतभूषण क्षीरसागर व दीपाताई क्षीरसागर यांनी नाट्य, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक यासारख्या चळवळी राबवून बीडच्या सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान दिलं.त्यामुळे या चळवळींच्या माध्यमातून बीडची नवी ओळख निर्माण झाली. नुसता शहराचा रस्ते ,नाल्यांचा विकासच नाही तर समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यशैलीचाच परिणाम म्हणून प्रत्येक वेळी न प निवडणुकीत डॉ. भारतभूषण बुद्धिवादी वर्गांने डोक्यावर घेतलं. प्रचंड जनसंपर्क, व्यक्तिगत संबंधाच्या जोरावर जातीपाती धर्माचा राजकारण न करता विरोधकांनाही आपलंस करण्याची वृत्ती प्रत्येक निवडणुकीत यश देत गेली. मात्र योगेश भैया तुम्ही स्व. काकूंच्या विचारधारेलाच मूठ माती दिली नाही तर बीडच्या सर्वांगीण विकासाला खिळ बसवण्याचा चंग देखील बांधला आहे असं चित्र सध्यातरी दिसत आहे. सामाजिक शैक्षणिक राजकीय ,नाट्य, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळत असते त्या चालनेला खंडित करायचं काम होत असल्याचं दिसू लागला आहे. नुसतं काँक्रेट जंगल तयार करून शहराचा विकास होत नसतो, तर क्रियाशील समाज निर्मितीतूनच शहरं आपली ओळख निर्माण करतात याचा विसर पडल्यानेच डॉ. दीपाताई क्षीरसागर यांना प्रचारात पासून अलिप्त ठेवण्याचं काम केलं जाऊ लागला आहे. त्यामुळे बुद्धिवादी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून याचा फटका निवडणुकीत बसणारच असं राजकीय विश्लेषक सांगू लागले आहेत. शेवटी तो तुमचा घरचा विषय आहे पण बीडच्या जनतेला दीपाताईंची अनुपस्थिती खटकू लागली आहे. त्यातच दीपाताई क्षीरसागर यांनी कधीच निवडणूक काळात मर्यादा भंग होईल अशी भाषा वापरली नाही. मात्र स्थानिक दैनिकाला सारिका क्षीरसागर यांना मर्यादांचे भान ठेवा असा सल्ला द्यावा लागला. हे बीडच्या सांस्कृतिक अध: पतन कसं होणार आहे याचा नमुना ठरणार उदाहरण आहे.
योगेश भैय्या…! तुम्ही काकूंच्या विचाराचे होणार नाहीत.तुम्हाला दीपाताईंसारखे सुसंस्कृत चेहरे नकोत ? मग तुम्हाला जनतेने का स्वीकारायचं? तुमच्या हातात न प ची सत्ता देऊन शहर बकाल करायचं का? ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षाची स्वार्थासाठी तुम्ही धरलेली कास जनतेच्या पचनी का पडावी? असे एक ना अनेक प्रश्न जनतेला पडू लागले आहेत.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles