Sunday, February 1, 2026

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मसाजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन मागे

केज — सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मागण्या मान्य कराव्या यासाठी मंगळवार पासून देशमुख कुटुंबीयांसह मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेले लेखी आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजता अन्न त्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे.मात्र, लेखी आश्वासन दिलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

खा.बजरंग सोनवणे, आ.सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आंदोलकांनी हस्ते शरबत घेऊन आंदोलन मागे घेतले. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी
मसाजोग ग्रामस्थांनी प्रशासनाकडे 9 मागण्याचे निवेदन सादर केले होते. व मंगळवारी सकाळी 10 देशमुख कुटुंबीय व गावाकऱ्यांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन बुधवारी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.दरम्यान, खा बजरंग सोनवणे यांनी आंदोलन स्थळाहून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना कॉल करुन आंदोलनाचे गांभीर्य सांगितले. 9 पैकी पोलीस अधीक्षक यांच्या कक्षेत येणाऱ्या 4 मागण्या या मस्साजोग ग्रामस्थांचे सविस्तर निवेदन मिळाल्यानंतर 8 दिवसात मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासनाचे पत्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्फत पोलिसअधिक्षकांनी दिले. खा बजरंग सोनवणे आणि आ सुरेश धस हे ही मस्साजोग मध्ये दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आ. धस, खा. सोनवणे या तिघांनीही आंदोलक ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पोलीस अधीक्षक यांचे आश्वासनाचे पत्र वाचून दाखविल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दहा दिवसाची मुदत देत खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते शरबत देऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles