बीड — शेतकऱ्याची संमती न घेता सामूहिक शेती असलेल्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रेन्यू पॉवर या कंपनीचे बीड तालुक्यातील मोरगाव हद्दीमध्ये कार्यालय असून तेथील संबंधित गुत्तेदाराने मनमानी करत शेतकऱ्यांची पूर्ण परवानगी न घेता वहीत शेतामध्ये विद्युत पूल उभे केले असून ते पोल काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे सदर निवेदन संबंधित कंपनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, नेकानूर पोलीस स्टेशन तहसीलदार बीड यांना दिले आहे.
बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी विलास नरहरी चौरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या रिन्यू पावर कंपनी ही सौर ऊर्जा (पवनचक्की) निर्माण करणारी कंपनी असून या कंपनीचे मोरगाव हद्दीमध्ये मांजरसुंबा लिंबागणेश रस्त्यावर कार्यालय असून या कंपनीने विद्युत लाईन ओढण्यासाठी काही कंत्राटदाराची नेमणूक केली आहे प्रामुख्याने ज्यांच्या वहीती असलेल्या शेतामधून किंवा मालकी हक्कातून पोल किंवा लाईन ओढली जाणार आहे त्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असताना या कंपनीने मनमानी करत गुत्तेदाराकरवी नियमबाह्यरित्या विद्युत पोल उभे केले आहेत विशेषतः हे पोल उभे करताना ज्या गटातून शेतातून विद्युत लाईन किंवा पॉल उभे केले जाणार आहेत त्या शेतकऱ्यांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही सामूहिक शेती असेल तर सर्वांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही विशेष म्हणजे यापूर्वीच गाव तलावासाठी आमची जमीन शासनाने संपादित केली आहे आणि आमच्या कुटुंबाची उपजीविका आता त्याच वहिती जमिनीवर असल्याने त्याच वहिती जमिनीवर मनमानी पद्धतीने रेन्यू पॉवर कंपनीने व त्यांच्या गुत्तेदाराने विद्युत पूल उभे केल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे भविष्यातही ही जमीन नापीक होऊ शकते तेव्हा माझ्या जमिनीमध्ये उभे केलेले रेन्यू कंपनीने विद्युत पोल त्वरित काढण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे संबंधित कंपनीला निवेदन देण्यासाठी गेली चार दिवस चकरा मारल्या मात्र तेथे कोणीही अधिकारी आढळून आला नाही म्हणून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले

