Sunday, February 1, 2026

दर्जेदार बंधारे उभारुन पाण्याचा प्रश्न सोडवणार — अमरसिंह पंडित

कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधा-याचे उद्घाटन

गेवराई — पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील कुंभेजळगाव, राजपिंप्री आणि परिसरातील शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करत असल्याने आपण प्रभावित झालो, त्यामुळे अशा दुष्काळी भागाची निवड करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा उभारण्याचे काम आपण हाती घेतले आहे. बंधा-याचे काम दर्जेदार होईल याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल. आगामी काळात गेवराई तालुक्यात २२ बंधारे उभारणार असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले.जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव येथील १५ लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास नवले, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, शिवाजीराव दिवाण, राधाकिसन शेंबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, कुंभेजळगाव, राजपिंप्री या भागातील बंधारे आणि ईतर विकास कामामुळे या भागातली लोकांच्या दैनंदिन जीवन आणि अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होईल. रस्ते, नाली, पुल, लाईट तसेच या भागातील वाहून गेलेल्या बंधारे दुरुस्तीचे काम केले जाईल. ब्रम्हगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा या ग्रुप ग्रामपंचायत विभागून प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा विचार असून यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कुंभेजळगाव येथील गावाला जोडणारा ५०० मिटरच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल, त्याच बरोबर दलित समाजाच्या स्मशानभूमीचे काम र्लवकरच केले जाईल. गेवराईच्या दुष्काळी भागात आगामी काळात २२ बंधारे उभा करतोय. बंधा-यांचे काम दर्जेदार काम होईल. याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबप्पा लेंडगुळे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कुभेजळगाव येथील उपसरपंच शेख सद्दाम, सुदाम लेंडगुळे, कल्याणराव पांगरे, लहुराव पांगरे, बळीराम पांगरे, भुजंगबापू पांगरे, महादेव पांगरे, हरी झेंडे, भिकाजी राठोड, रुस्तुम पांगरे, चेअरमन गणपत राठोड, अभिमान लेंडगुळे, उद्धव पांगरे, योगिराज चव्हाण, सुरेश पांगरे, संजय गायके, रामचंद्र पांगरे, पोपट चव्हाण, कोळगावचे सरपंच राजेंद्र कदम, अशोक करांडे तसेच राजपिंप्री येथे संतोष पानखडे, दिलीप पानखडे, बापु धोत्रे, गोरख म्हेत्रे, सुरेश पानखडे, विष्णू चव्हाण, विजय हराळे, सौ. विमल धोत्रे यांच्यासह कुंभेळगाव आणि राजपिंप्री येथील येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles