बीड — सर्वसामान्य जनतेचे गॅस टंचाईमुळे हाल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केलेला आहे मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी सर्रास केला जात असल्याने होणारी काळाबाजारी कधी रोखली जाणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
जग एकीकडे इंधन टंचाईमुळे त्रस्त आहे. अशावेळी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कडक पावलं उचलली आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंधन आणल्यामुळे सध्या तरी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागला आहे. इराण युद्धामुळे आणखी किती दिवस इंधन टंचाई जाणवेल याचा अंदाज बांधणं अवघड झालेलं आहे अशावेळी
पेट्रोकेमिकल विभागातून गॅस वळवल्यामुळे दैनंदिन वापराच्या गॅस उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार कडक पावलं उचलत असताना दुसरीकडे मात्र बीड शहरासह जिल्ह्यात
हॉटेल खानावळ, चहाची टपरी, चाट भांडार,धाबे आशा व्यावसायिक ठिकाणी गेल्या सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आलेला असताना बीडमध्ये मात्र अशा व्यवसायांना कुठलाच फरक पडला नाही.गॅस टंचाई जाणवली नाही. मात्र राजरोस होणाऱ्या या काळाबाजारी मुळे सर्वसामान्य जनतेला गॅस टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्हा पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत काळाबाजारीला खतपाणी घालत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवला तर याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.व्यावसायिक प्रतिष्ठानासह काळाबाजार करणाऱ्या लोकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.

