बीड — जनावरांची मोठी बाजारपेठ असलेल्या नेकनूर मध्ये गोवंशाची हत्या करून गोमांसाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. गोवंश हत्या विधेयकाची गळचेपी ठाणे प्रमुखाच्या वरदहस्ताने होत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील गावामधून जुगारासह बनावट व अवैध दारूचा पूर वाहू लागला आहे. शेतीमालावर दरोडे टाकणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. माध्यमामधून तसेच जनतेकडून पोलीस अधीक्षकांपर्यंत याची तक्रार केली जात असली तरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचाच परिणाम म्हणून ठाणे प्रमुख गोसावींना वरिष्ठांचा धाक वाटेना असा झाला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत जरी प्रामाणिक अधिकारी असले तरी त्यांचा वचक कर्मचाऱ्यावर राहिलेला नसल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अवैध धंद्यामधून मिळत असलेल्या कमाईचा लाभ वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याने गोसावींना अभयदान मिळत असल्याची चर्चा जनतेत होऊ लागली आहे. पत्यांचे क्लब ,मटका, हातभट्टी, दारू, केमिकल युक्त ताडी यासारखे अवैध धंद्यांमधून मिळणारी कमाई कमी आहे म्हणून की काय पण गोवंश हत्येकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून नेकनूर गोमांस विक्रीच केंद्र बनलं आहे. गोवंश हत्या बंदी विधेयकाचे तीन तेरा वाजवले जात आहेत. या ठिकाणावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस तस्करी ऑर्डर प्रमाणे केली जात आहे. बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात 27 जुलै 2025 रोजी गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना बार्शी नाका भागात पकडल्याची घटनेची नोंद करण्यात आली होती. अरबाज जलाल खान पठाण वय वर्ष 26, दर्गा कॉलनी नेकनुर याला पकडले देखील.यावेळी पोलिसांनी गोमांस सुद्धा जप्त केले होते. असं असतानाही पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रमुख मूदीराज यांना प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता वाटली नाही. थोडाफार पैसा घेऊन तात्काळ जामीनही देण्यात आल्याने त्यांच्या देखील प्रामाणिकतेवर जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यभरात कुरेशी समाजाने बहिष्कार टाकल्याने जनावरांचा बाजार ठप्प झालेला असला तरी गोवंशाच्या हत्या करणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याच पाहायला मिळत आहे. अशा घटना उघडकीस येऊनही नेकनूर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून गोवंश हत्या करणारा विरोधात कारवाई करावी. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या ठाणे प्रमुखावर देखील कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

