गेवराई — गेवराई नगर परिषदेची निवडणुक आपण विकासाच्या मुद्यावर लढवत आहोत. नगर पालिकेची सत्ता आम्हाला स्वतःचा विकास नाही तर शहराचा कायापालट करण्यासाठी पाहिजे आहे. विकास कामांचा आराखडा आमच्याकडे तयार आहे, 35 कोटी रुपयांची विकास कामे मंजुरही झाली आहेत, त्यापैकी दहा कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण देखील झालेली आहेत. उर्वरित विकास कामे गतीने करण्यासाठी आणि गेवराई शहराची नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका, प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि संवाद साधताना ते बोलत होते.
गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहर पिंजून काढले. यावेळी अमरसिंह पंडित यांनी विविध प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विकास कामांच्या मुद्यावर घड्याळ चिन्हाची निवड करून गेवराई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याचे आवाहन कले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विकासाचा मुद्या सोडून विरोधक मतदारांची दिशाभूल करत आहेत, मतदारांनी मात्र धमक्या, अफवा आणि भुलथापांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यासह प्रभाग 1 मधील सौ. गंगासागर विठ्ठल पवार व भास्कर भिकाजी काकडे, प्रभाग 2 चे विश्वजित प्रल्हाद शिंदे व सौ. संध्या राधेशाम येवले, प्रभाग 3 चे विलास दौलत गुंजाळ व श्रीमती नजमा बेगम निजाम शेख, प्रभाग 4 चे सौ. संगीता दादासाहेब घोडके व शाहरूख खाँ पठाण, प्रभाग 5 चे अशोक छगनराव गायकवाड व सौ.अंजुश्री महेश मोटे, प्रभाग 6 चे सौ. वैशाली किशोर कांडेकर व श्रीमती जाकेरा बेगम इस्माईल शरीफ, प्रभाग 7 चे सौ. पुजा रजनीकांत सुतार व मनोज प्रभाकर धापसे, प्रभाग 8 चे सौ. अंजु संतोष सुतार व विनोद उर्फ तुळशीराम निकम, प्रभाग 9 चे सौ.मंगल आत्माराम हजारे व श्रीकृष्ण विश्वनाथ मुळे, प्रभाग 10 चे सौ. रेणुका शिवलिंग संभाहारे व शेख खाजा कटूमियाँ या सर्व उमेदवारांच्या नावासमोरचे घड्याळाचे चिन्ह दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

