गेवराई तालुका कृषी कार्यालय वाऱ्यावर …! अधिकारी कुठे झाले गायब ? Gevarai Taluka Agriculture Office on the wind…! Where did the officers disappear?

गेवराई — शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आलेल्या विविध योजना, बी-बियाणे, औषधी यासह विविध प्रकल्पाच्या कामासाठी शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, गेवराई कृषी कार्यालय हे वाऱ्यावर असून दुपारी 12 पर्यंत या कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यासह एकाही विभागातील अधिकारी हजर नसल्याची बाब गुरूवार ता. 29 रोजी दिसून आले. दरम्यान, वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई कृषी कार्यालयाचा कारभार ढेपळलेला असून आपल्या कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना रोजच चकरा माराव्या लागत आहेत. दरम्यान याबाबत संबधित काधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केला तर फिल्डवर असल्याचे सांगून दिवस दिवस दांडी मारतात तर कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी, लिपिक, कनिष्ठ लिपिक यासह कर्मचारी कार्यालयात आढळून येत नाहीत. अनेक अधिकारी व कर्मचारी हे रजा न टाकता दोन-दोन दिवस गायब असल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबून पडत आहेत. दरम्यान, गुरूवारी दुपारी 12 वा या कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता याठिकाणी एकही जबाबदार अधिकारी व कर्मचारी आढळून आला नाही. कार्यालयात सर्व खुर्च्या रिकाम्या दिसू आल्या. तालुका कृषी अधिकारी यांचे दालन बंद होते. कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी वडकूते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल होता.